'शंकर- जयकिशन यांचं संगीत, नेहरूंची भाषणं आणि रेशनचं किडकं धान्य यावर आमचं बालपण गेलं', असं एकदा शिरीष कणेकरांनी म्हटलंहोतं.

रेशनचं किडकं धान्य याला पर्याय नव्हता. पण 'शंकर- जयकिशन यांचं संगीत, नेहरूंची भाषणं याला पर्याय होते.  नेहरूंची भाषणं ऐकण याला नेहरूंची भाषणं ऐकण असा सोपा आणि मोफत मिळणारा पर्याय होता. तो आम्ही भरपूर वापरला. आमच बालपण कुमारांचा शंकरा (सिर पे धरी गंग); सलामत अली नजाकत अली यांचा मधुवंती (तुमरे दरस को); माणिक वर्मा यांचा श्याम कल्याण (जियो मेरो लाल, सावन की सांझ);  बाबूजींच गीत रामायण;  वगैरे ऐकण्यात गेल आणि सध्या आमच म्हतारपण सुद्धा तेच ऐकण्यात जात आहे.  बाय द वे, हे नदीम श्रावण कोण ? काही गाण-गिण करतात का?