बहुतेक मुद्दे अमान्य.
संस्कृत ही समजायला व वापरायला अवघड भाषा आहे असे सर्वसामान्य लोकांना वाटले असते पण इस्रायलने हिब्रू भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार केल्यावर त्या भाषेत सर्व आवश्यक साहित्य निर्मिती केली तसेच संस्कृतचे झालेही असते.

१- हिब्रू बरोबर तुलना अप्रस्तुत आहे. हिब्रू तुम्हाला व मला कोणालाच येत नाही म्हणून हिब्रू भाषा म्हणून सोपी आहे, का अवघड हे आपल्याला माहीत नाही.
२- भाषा अवघड असणे/ नसणे, व त्यात साहित्य निर्मिती होणे/ न होणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संस्कृत मध्ये भरपूर साहित्य आधी पासून आहेच. संस्कृत अवघड नसेल तर लोक संस्कृत आत्मसात करून ( शिकून नव्हे) संस्कृत साहित्य का वाचीत नाहीत? आत्मसात करून तर सोडाच, पण बारावी पर्यंत रीतसर संस्कृत शिकणारे सुद्धा संस्कृत साहित्य वाचीत नाहीत.
३- माझे सर्व शिक्षण दिल्ली येथे झाले. मी आठवी पर्यंत हिंदी, व त्या नंतर ११ पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकलो.  व त्या नंतर आयआयटी ला गेल्या नंतर अर्थातच इंग्रजीत. तरी सुद्धा मी उत्तम जरी नाही तरी चांगले, किमान बरे, मराठी बोलू-लिहू शकतो.  मराठी, हिंदी, बंगाली, . . . या भाषा  शिकाव्या लागत नाहीत. संस्कृत मात्र शिकावी लागते. यातच सर्व काय ते आले.
४- इंग्रजी शिकविणारे वर्ग साधारण तीन महिन्यात (प्रत्येकी दीड तासाचे ५० क्लास) संभाषण, व्यवसाय इत्यादी करता वापर, इंग्रजी पेपर वाचणे, या करता  करता पुरेसे इंग्रजी शिकवितात. येवढ्याच वेळात किती संस्कृत शिकता येईल?
४- तर, संस्कृत निःसंशय अवघड आहेच. अत्यंत अवघड आहे. म्हणून संस्कृत शिकावे लागते. ते सुद्धा अनेक वर्षे.  इतर भाषा लोक जसे आपल्या आपण आत्मसात करतात, तसे संस्कृत नाही करता येत. म्हणून तर ती भाषा वापरातून गेली.
५- संस्कृत घेतल्यास बहुतेक विद्याथ्यांना चांगले गुण  मिळतात या वरून  हे सिद्ध होते, कि संस्कृत शिकणे ह निव्वळ घोकंपट्टीचा मामला आहे.  त्यात "बुद्धी"ची फारशी गरज नाही. (जशी गणित, विज्ञान इत्यादी करता असते)
६- माधव ज्यूलियन व अलीकडे सुरेश वैद्य यांनी अतिशय जोरकस काव्यात मराठीचे थोरपण वर्णन केले आहे. मराठी भाषा थोर आहे, (म्हणजे नक्की काय? ) हा एक लोकप्रिय भ्रम.
अ)  माधव ज्यूलियन व सुरेश वैद्य हे स्वतः मराठी भाषिक असल्याने ते मराठीचेच गोडवे गाणार, तामिळ अथवा पंजाबीचे नव्हे.  हे लक्षणीय (significant ) नाही.
ब) माधव ज्यूलियन व सुरेश वैद्य यांनी मराठी (व हिंदी, इंग्रजी) व्यतिरिक्त पंजाबी/ बंगाली/ मिझो / तेलुगु/ कानडी/ तामिळ/ मल्याळम/ . . . इत्यादी भाषा पण शिकून मग मराठी थोर ठरविली, का  फक्त मराठीच शिकून मराठी थोर ठरविली? ("पुणे तेथे काय उणे? " हे पुण्याच्या बाहेर वास्तव्य केले असेल तरच समजू शकते)
क) जर कोण्या पंजाबी/ बंगाली/ मिझो / तेलुगु/ कानडी/ तामिळ/ मल्याळम/ . . . भाषिकाने मराठी शिकून मराठी त्याच्या मातृभाषे पेक्षा थोर आहे असे म्हंटले, तर ते significant. अन्यथा, मराठी भाषिक मराठीचे थोरपण वर्णन करणार;  बंगाली भाषिक बंगालीचे थोरपण वर्णन करणार;   तामिळ भाषिक तामिळचे थोरपण वर्णन करणार;  . . . .  त्यात काय विषेश?
७- मुळात अमुक एक भाषा थोर म्हणजे नेमके काय ? हिंदीत नपुसकलिंग नसतेच. फक्त पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग. पंजाबी व गुरुमुखी लिपीत जोडाक्षरेच नसतात. "भास्कर" ला ते "भासकर" लिहीतात. म्हणून त्यांचे कुठे काही अडते? कधी कोण्या हिंदी साहित्यिकाने असे म्हंटले आहे का, "आमच्या भाषेत नपुसकलींग नसल्याने फार गोची होते. मला एक कथा लिहायची होती, जी लिहिण्या करता भाषेत नपुसकलिंग असणे आवश्यक होते.  ते नसल्याने मला ती कथा लिहीण्यात फार तडजोड करावी लागली", असे कधी झाले आहे? मराठी भाषा थोर याचा अर्थ येवढाच, कि "आपल्या तो बाळ्या, शेजारच्याच ते कार्ट".
८- जगात १.१% लोक मराठी भाषिक आहेत. (वाचा). याचा अर्थ असा, कि  जगात ९८.९% लोकांना मराठी येत नाही. म्हणून त्यांचे कुठे काही अडते? काहीही अडत नाही, सगळे उत्तम चालले आहे. तेव्हां मराठी ही "आपली" म्हणून त्या करता प्रेम असावे, थोडी अस्मिता पण  असावी, (पण थोडीच, अति नव्हे). मात्र भ्रम नसावेत.