हे बरोबर आहे . समर्थ तेच सांगताहेत. 

श्रीराम हे आदर्श नीतीमूल्यांचे प्रतिक आहे. 
त्यांच्यासारखे व्हायचे म्हणजे त्यांनी जी आदर्श जीवनपद्धती दाखवली, त्याचे अनुकरण  करणे. 
 
सत्याचा साक्षात्कार झाला... जग मिथ्या आहे समजले, तरीही जगणे संपले नाहीच. 
या मायावी जगातले सारे भोग भोगणे  बाकी असतेच ना.. 
सारे मिथ्या आहे असे समजून देखिल  तुम्ही जीवनाचा त्याग करीत नाही.  म्हणून जगणे सुसह्य व्हावे, या साठी जे निर्विवाद आदर्श  आहे, त्याचे अनुकरण करावे . यात कुठलाही अहंकार नाही, अथवा मीपणा नाही. आणि दिशाभूल होण्याचा प्रश्नच नाही. 
.... जर दैवी चमत्कार, अवतार इ. काही म्हणले तर ती फसवणूक ठरली असती. 
पण  तसे  काहीच नाही. 
सर्वसामान्य जन सहसा साधनेच्या मार्गी जात नाहीत. त्यांचे जगणे सोपे व्हावे म्हणून हा उपदेश. 

सत्य कबूल असेल तर ..  असे म्हणणे निरर्थकच.  कारण जे आहेच, ते स्वीकारणारे  अथवा नाकारणारे आपण कोण?  नाही का?