काँग्रेसच्या
काळात कर्नाटकात आणि महाराष्ट्रात दोन खून झाले. पण काँग्रेसच्या अपयशाबाबत
कोणीच विचारत नाहीये. पण लंकेशच्या मृत्यूबाबत मोदी गप्प का असा सवाल
विचारला जातोय. त्यामुळे कर्नाटकात कुत्रं मेलं तरी मोदी जबाबदार का ? (राष्ट्रीय हिंदू सेनेच्या प्रमोद मुतालिक)
प्रतिसाद :
प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्याबाबत केलेले वक्तव्य
घृणास्पद आणि लांछनास्पद आहे. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्पच बसणार का? (काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी )
कुत्र्याच्याऐवजी मुतालिक फुलपाखरू म्हणाले असते, तरी राहुल गांधींनी असेच म्हटले असते.
कुत्र्यांचा अपमान केल्याबद्दल मुतालिकांचा तीव्र निषेध!
ग्रामपंचायतीपासून ते थेट राज्याच्या राजधानीपर्यंत, गल्लीपासून ते
थेट दिल्लीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, मुंबई पासून ते
आसामपर्यंत, आसेतुहिमाचल काहीही घडले तरी त्यासाठी राहुल गांधींपासून ममता
बॅनर्जींपर्यंत, सुनित चोपडांपासून ते अरुंधती रॉयपर्यंत, अरविंद केजरीवाल
पासून ते चंद्राबाबू नायडूंपर्यंत, कुमारस्वामीपासून ते शरद पवारांपर्यंत,
संपादक-स्तंभलेखकांपासून ते वाहिन्यांवरील सूत्रधारांपर्यंत, सर्वच विरोधी
पक्ष, विचारवंत, बुद्धिजीवी, ढोंगी धर्मनिरपेक्षतावाले थेट देशाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरत आहेत. जर या सर्वच
घटना-दुर्घटनांना जर मोदीच जबाबदार असतील, तर राज्याराज्यात असलेल्या विविध
सरकारांची, पोलिस अधिकाऱ्यांची, राजकीय नेत्यांची, नगरसेवकांची,
आमदारांची-खासदारांची जबाबदारी काय आहे? की हे पांढरे हत्ती केवळ सरकार
विरोधी हिंसक आंदोलने करणे, सार्वजनिक संपत्तीची विधुळवाट लावणे, सरकारी
सवलती उकळणे, जनतेच्या पैशाने सरकारी सुरक्षा घेणे, पंतप्रधानांना सतत सवाल
करणे यासाठीच असतील तर त्यांना घरी पाठवणेच योग्य होईल.
ढुंगण धुताना पप्पूच्या टमरेल मधलं पाणी संपलं तर त्यासाठी सुद्धा तो मोदींनाच जबाबदार धरेल.