जे (म्हणजे राहुल गांधी) ३० हजार रुपयांचा पिझ्झा खातात त्यांना
१२ हजार रुपये पगाराची नोकरी दिसत नाही असे गिरिराज सिंह म्हणाले. आपल्या
मंत्रालयाने चार कोटी नोकऱ्यांची निर्मिती केल्याचाही त्यांनी दावा केला.
ज्यांना दिसत नाही त्यांना नोकऱ्यांची निर्मिती कशी केली जाते हे मला
दाखवायचे आहे. ज्यांनी कधी गरिबी बघितली नाही ते (म्हणजे राहुल गांधी) गरिबीबद्दल जाणून
घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कलावतीच्या घरी जातात. मुद्रा योजनेतंर्गत उद्योगासाठी कर्ज देण्याबरोबर आपल्या मंत्रालयाने १० कोटी रोजगार निर्मिती केली . (केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह )
प्रतिक्रिया :
करोडसाठी एकवर किती शून्य लागतात हे माहीत आहे का या माठ्याला?
किती फेकावॅ बाबा माणसाने..
राजा, देवाला नाही पण स्वतःला तरी घाबर...!!
१० कोटी नोकऱ्या ? म्हणजे भारत बेरोजगारी मुक्त झाला असेल एव्हाना !