देशात पुन्हा भाजपाची सत्ता आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल. भाजपाने २०१९ सालची लोकसभेची निवडणूक जिंकली तर हिंदू पाकिस्तानच्या
निर्मितीला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. भाजपाने २०१९च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या तर आपल्या लोकशाही आणि
संविधानाला धोका निर्माण होईल. संविधानातील सर्व मुलभूत तत्त्वे काढून
टाकण्यात येतील तसेच नवे संविधान निर्मितीचे काम सुरू होईल. त्यामुळे तयार
झालेले नवे राष्ट्र हे हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतांवरच चालेल.
अल्पसंख्यांकांमधील समानता नष्ट होईल. हे दिवस पाहण्यासाठीच महात्मा गांधी,
पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद आणि इतर महान नेत्यांना
स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला होता का?, (काँग्रेस नेते शशी थरुर )
प्रतिक्रिया : शशी थरूर यांच्या विरोधात कोलकाता सत्र न्यायालयाने समन्स बजावले असून
त्यांना हजर होण्यास सांगितले आहे. कोलकाता शहरातील वकील सुमीत चौधरी यांनी
दाखल केलेल्या गुन्हेगारी तक्रारीवरुन कोर्टाने थरूर यांना समन्स बजावले
आहे.
शशी थरुर यांनी हे विधान करुन भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांनी संविधानाचा अपमान केला आहे. धार्मिकतेच्या आधारावर त्यांना समाजात वाद आणि मतभेदांची दरी निर्माण करायची आहे. त्यांनी त्यांच्या विधानाबद्दलही माफी मागायला नकार दिला आहे (सुमीत चौधरी)