मुळात आनंदाचा शोध हीच चूक आहे कारण आनंद ही कायम स्थिती आहे, तो घटनेचा परिणाम नाही. दुःख ही स्वतःपासून विलग झाल्याच्या भ्रामक समजुतीमुळे उद्भवलेली परिस्थिती आहे, ते घटनेमुळे ओढवत नाही. एकदा का हा उलगडा झाला की आपण कायम स्वतःशी कनेक्टेड राहतो, कायम आनंदी राहतो.
तुम्ही म्हटलंय तो " स्वीकार " हा संतांनी सांगितलेला मार्ग आहे, पण त्याला मन राजी होत नाही, त्यामुळे दुःखाचं कारण " अस्वीकार " नाही, तर " गैरसमज " आहे. आपण स्थिती आहोत, व्यक्ती नाही हा उलगडा आपल्याला घटनेपासून अलग करतो कारण घटना आकारात घडते, निराकाराला काहीही होत नाही.
हे जग चतुर्मिती आहे; त्यात शरीर, मन आणि घटना या त्रिमितीत काम करतात आणि आपण घटनेची चतुर्थ मिती आहोत. त्यामुळे घटना काहीही असो, तीचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि ही " निष्परिणाम " स्थिती आनंद आहे !