जागतीक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२० पर्यंत भारतात जास्तीत जास्त मधुमेही रूग्ण असणार आहेत.
डॉ. दिक्षीतांच ६ ऑगस्ट २०१८ रोजी पुण्यातील भाषणाचा हा नवीन व्हीडीओ आहे. वेळ ५५ः१९ मिनिटे
https://youtu.be/Pm6neCIJbUE
निरनिराळे डाएट प्लॅन का फसतात? किंवा त्यामध्ये सातत्य का ठेवता येत नाही?
१. काही प्लॅनमध्ये काहीतरी करून उपाशी ठेवतात. पण हे आयुष्यभर करणे जमणे शक्यच नसते.
२. काहीमध्ये असे काही भन्नाट पदार्थ सुचवलेले असतात. नंतर नंतर हे पदार्थ खाणे जिकीरीचे वाटायला लागते.
३. काहींमध्ये सतत किंवा रोज मार्गदर्शन घ्यायला लावतात. त्यामुळे पुढे पुढे स्वातंत्र्यच गमावल्यासारखे वाटते.
४.काही इतके खर्चिक असतात की पैसे संपल्यावर तो डाएट प्लॅनपण संपुष्टात येतो.
५. प्रत्येक माणसाची एक प्रवृत्ती असते. काहीं प्लॅनमधे त्या प्रवृत्तीविरोधातले खायला लागते. पण असे कायम करत राहणे जमत नाही.
पण जर डाएट प्लॅन यशस्वी व्हायला पाहिजे असेल तर तो प्लॅन कसा असायला पाहिजे? किंवा डॉ. दिक्षीतांचा डाएट प्लॅन मध्ये सात्यत टिकवणे का शक्य होते?
१. पैसे लागणार नाहीत.
२. तज्ञाकडे जायला लागणार नाही.
३. मशीन विकत आणायला लागणार नाही.
४. कुठलाही पूरक आहार विकत आणायला लागणार नाही.
५. आयुष्यभर आनंदाने करता आले पाहिजे.
संदर्भ - ३०ः०८ ते ३२ः २४
प्रोटीन देणारे शाकाहारी पदार्थ
मूठभर कडधान्ये
सोयाबीन
चीज, पनीर
शेंगदाणे
डॉ. दिक्षीतांनी ७ राज्यातल्या २७ शहरातील १००० मधुमेहींचा अभ्यास केल्यावर, मधुमेहावरील सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे यासाठी पहा ४४:३४ ते ४६ः५२
मधुमेहाबद्दल डॉक्टर लोकांना चुकीचे शिकवल गेलयं.
डॉक्टर लोकांना शिकवले गेलेय की मधुमेह हा बरा होणारा आजार नाही तर तो कायम वाढत जाणारा आहार आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे.
४६:२४ ते ४६ः५२