१९८४ची शीख दंगल ही मोठी दुःखद घटना होती. त्याचा काँग्रेस पक्षाचा
काहीही संबंध नव्हता’ (राहुल गांधी)
प्रतिक्रिया : १. राहुल गांधींच्या मते जर
शीख नरसंहार झालाच नव्हता तर आज मी म्हणते की, त्यांची आजी (इंदिरा गांधी)
आणि त्यांचे वडील (राजीव गांधी) यांची हत्या झाली नाही, तर या दोघांचा
मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.
(केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल)
२. राहुल गांधी यांनी आपल्या या वक्तव्याच्या माध्यमांतून स्पष्टपणे संदेश दिला आहे की, हे हत्याकांड घडवून आणलेल्यांच्या बाजूने ते आहेत. राहुल यांच्या या वक्तव्याने दंगल पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. (हरसिमरत कौर यांचे पती आणि शिरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल)