पाकिस्तानचा माझा दौरा दक्षिण भारतातील दौऱ्यापेक्षा खूपच चांगला होता.तुम्ही पाकिस्तानात कधीही जा.. तिथे भाषा, माणसे
खाद्यसंस्कृती काहीही बदलत नाही. मात्र तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तिथे
तुम्हाला इंग्रजी किंवा त्यांची भाषा शिकावी लागते. पाकिस्तानात असे
काहीही नाही. (सिद्धू}
प्रतिसाद : आपण लोक पाकिस्तानचा विनाकारण द्वेष करतो. माझ्या एका मित्राबरोबर
सुध्दा माझा असाच वाद व्हायचा. योगायोगाने तो स्वतःच पाकिस्तानला जाऊन आला.
तेथे त्यांनी असे अनुभवले की, पाकिस्तानी लोक भारतातून आलेल्या व्यक्तीचा
आदर करतात, सन्मान करतात. त्याला, अाप तो हमारे भाई आहे असे संबोधून वस्तू
विकत घेताना डिस्काउंट देणे, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जादा पदार्थ देणे
असे प्रकार घडतात. खरे तर आपल्या राजकारण्यांनी हे वातावरण बिघडवलेले आहे
आणि आपणही विनाकारण त्याला बळी पडत अाहोत. सिद्धूने पाकिस्तान विषयी थोडेसुद्धा चांगले बोललेले आपल्याला आवडत नाही. त्यांच्या लष्करप्रमुखांनी जर,
आम्हाला सुद्धा शांतता हवी आहे असे म्हटले तर त्यात गैर काय अाहे? शांतता ही
दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. त्यादरम्यान सर्वांनी संयम पाळणे हाच
उपाय असतो. अापण शांत राहून या गोष्टींचे अवलोकन केले किंवा कांही वेळा
राजकारण्यांविषयी प्रोत्साहनपर बोललो तर, ते सुद्धा कदाचित धाडसाने काही
निर्णय करू शकतील.