भगवान हनुमान मनुवादी लोकांचे गुलाम होते,  भगवान रामामध्ये जर शक्ती असती तर अयोध्येत तेव्हाच मंदिर उभारले असते.

राम हे मनुवादी आणि हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते. जर ते दलित नव्हते तर त्यांना मनुष्य का बनवले नाही ? त्यांना वानरच का बनवले ? त्यांचा चेहरा काळा का ठेवला..?  कारण ते दलित होते, म्हणूनच त्यांना असे केले.

दलित आणि मागासांना वानर आणि रक्षक म्हटले जाते. हनुमान एक मनुष्य होते. पण त्यांना वानर बनवण्यात आले. हे सर्व भगवान रामांनी केले. हनुमान दलित होते म्हणून त्यांना अपमानित करण्यात आले होते.

 भाजपाकडे राम मंदिर प्रकरणाखेरीज दुसरा कोणता मुद्दा नाही. त्यामुळे सातत्याने हाच मुद्दा ते वर आणत आहेत. देशाला मंदिराची गरज नाही. मंदिर उभारल्यामुळे दलित आणि मागासांच्या बेरोजगारीचा मुद्दा सुटेल का,? ... (सावित्रीबाई फुले)

मंदिर उभारल्याचा फायदा देशात अवघे ३ टक्के असलेल्या ब्राह्मणांनाच होईल. आम्हाला अधिकार हवा आहे, नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा, 

प्रतिसाद :   सावित्रीबाई फुले यांना  भारतीय परंपरेचे ज्ञान दिसत नाही,  (भाजपा प्रवक्ते चंद्रमोहन )