ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंच बाद झाल्यावर विराटने जबरदस्त सेलिब्रेशन केले. त्यानंतर या डावात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज जसेजसे बाद होत होते, तसे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य अधिकच वाढत होते. याच दरम्यान महत्वाचे गडी बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली तुफान सेलिब्रेशन करत होता.  असेच सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केले असते तर जगाला मिरच्या झोंबल्या असत्या,  आनंद साजरा करत सेलिब्रेशन करणे आणि समोरच्या खेळाडूला हिणवणे यात अतिशय थोडे अंतर असते. विराटमध्ये क्रिकेटचे वेड आहे. पण त्याबरोबरच मैदानावरील सभ्यताही तितकीच महत्वाची असते, (जस्टिन लँगर)