३०० अतिरेकी मारले हा सरकारी दावा आहे. जर इमारत उध्वस्त झाल्यामुळे मृत देहांची संख्याच कळत नसेल तर त्यांनी हा आकडा कुठून काढला ? जर सरकार मृत देहांची संख्या सांगू शकत असेल तर ते मृत देह कुठे आहेत असा तर्कपूर्ण प्रश्न आहे. पण सगळी बुद्धी भक्तीला गहाण ठेवल्यामुळे विचारशक्ती शून्य होते आणि मग काहीही झालं तरी नेतृत्वाची तळी उचलायचीच यापरता पर्याय राहात नाही.