एखाद्या व्यक्तीनं उत्तम कामगिरी केली तर इतिहास आणि जनता त्याची योग्य दखल घेताताच.

हे विधान "ती " व्यक्ती कोण आहे यावर अवलंबून दिसते. म्हणजे

१. जवाहरलाल नेहरू - १९५७ आणि १९६२ मध्ये पुन्हा निवडून आले.  कारण उत्तम कामगिरी
२. इंदिरा गांधी - १९७१ मध्ये पुन्हा निवडून आल्या. कारण उत्तम कामगिरी
३. मनमोहन सिंग - २००९ मध्ये पुन्हा निवडून आले. कारण (सोनियांची) उत्तम कामगिरी. कारण या दहा वर्षांमध्ये खरी सत्ता सोनियांकडे होती.
४. मोदी - २०१९ मध्ये पुन्हा निवडून आले, कारण फालतू चित्रपट काढले, जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आणि निवडणूक जिंकली.

श्री. नरसिंह राव आणि श्री. अटलबिहारी वाजपेयी - पुन्हा निवडून आले नाहीत, कारण काय असावे बरे? बहुतेक दोघांनाही फालतू चित्रपट काढणे आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे जमले नसावे.

विनायक