तुमचा तपशीलवार खुलासा मला पटला किंवा नाही हा मुद्दा आता गैरलागू आहे, कारण निवडणूक झाली आणि ती मोदींनी प्रचंड बहुमताने जिंकली. तुम्ही आणि मी तात्त्विक वाद करून काहीही निष्पन्न होणार नाही.

विनायक - हा तुमचा तर्क अमान्य. कारण  या न्यायाने इतिहासातील कोणत्याच घटनेची चीरफाड करता येणार नाही. पानिपतच्या  तिसर्‍या  लढाई  पासून  ते  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्व चषक स्पर्धे पर्यंत, प्रत्येक बाबतीत हेच म्हणता येईल, कि जे व्हायचे ते झाले आणि आता भाउसाहेबांनी जर अमुक केले असते, किंवा विराट कोहोलीने तमुक केले असते, . . . असा तात्त्विक वाद करून काहीही निष्पन्न होणार नाही. मात्र संजय क्षीरसागर काहीही यांच्या बरोबर चर्चा करून काहीही निष्पन्न होणार नाही. कारण, संजय क्षीरसागर यांचे तर्क चलाखीचे, फसवे, व दिशाभूल करणारे असतात. या प्रतिसादात  संजय क्षीरसागर यांची चर्चा करण्याची पद्धत फसवी व दिशाभूल करणारी कशी, त्याचे विश्लेषण आहे, त्यांच्या (कु)तर्कांची काही उदाहरणे घेऊन.

चेतन
तुमचे म्हणणे मान्य आहेच. फक्त संजय यांच्याशी तात्त्विक वाद करून काहीही निष्पन्न होणार नाही इतकेच म्हणायचे होते, कारण त्यांना फक्त मोदीविरोधाचे तुणतुणे वाजवायचे आहे, सत्यपरिस्थिती समजावून घ्यायची नाही.

विनायक