याचा अर्थ अज्ञानी लोकांनी मोठा मजेशीर लावला आहे.  जग्न्मिथ्या याचा अर्थ  जग खोटं आहे किंवा भ्रामक आहे असा होत नाही.  तर प्रत्येक आकार जो प्रकट झाला आहे तो कालौघात नष्ट होईल असा आहे परंतु निराकार  (किंवा ब्रह्म) निर्माणच झालेलं नाही, ते आहेच त्यामुळे ते नष्ट होण्याचा प्रश्नच नाही. एक साधं उदाहरण सर्व उलगडा करेल, शांतता निर्माण झालेली नाही, ती ध्वनी निर्माण होण्यापूर्वी होती, तिच्याशिवाय ध्वनी निर्मितीच होऊ शकत नाही. आता कितीही मोठा ध्वनी झाला तरी तो कालबद्ध असेल आणि यथावकाश तो शांततेच लयाला जाईल परंतु शांतता कधीही नष्ट होणार नाही. म्हणून ब्रह्म सत्य असं म्हटलंय.

पहिल्या उदाहरणातला गुरू अज्ञानी आहे.  शारिरिक बचावासाठी शरीर धावलं पण ज्यात ते धावलं ते अवकाश जरा ही हललं नाही कारण ते नष्ट होण्याचा प्रश्नच नाही.  अर्थात, गुरूच अज्ञानी असल्यानं त्यानं स्वतःचं अज्ञान लपवण्यासाठी काही तरी बोलून वेळ मारून नेली इतकंच. 

दुसरी कथा तर निव्वळ थोतांड आहे.  पुढच्या जन्मी डुकराचा जन्म घेऊन मोक्ष मिळवण्याची आशा करणारा गुरू तद्दन मूर्ख आहे कारण पुनर्जन्माला शास्त्रिय आधार नाही, शिवाय डुक्कर बोलू शकत नाही ही तर उघड गोष्ट आहे.