पहिल्या उदाहरणातला गुरू अज्ञानी आहे. दुसरी कथा तर निव्वळ थोतांड आहे. . . . गुरू तद्दन मूर्ख आहे
माझे मत किंचित वेगळे आहे. माझ्या मते दोघेही अज्ञानी आणी तद्दन मूर्ख आहेत. कोणताही प्रश्न उपस्थित न करता, कोणतीही शंका न घेता, केवळ गुरुने सांगितले म्हणून "ब्रह्म" म्हणून काही तरी आहे या वर विश्वास ठेवणारे, व तेच काय ते सत्य आहे या वर पण विश्वास ठेवणारे, तद्दन मूर्ख आहेत. मुळात ब्रह्म ही संकल्पनाच निव्वळ थोतांड आहे. "ब्रह्मच काय ते सत्य आहे". कशावरून? तर गुरुने तसे सांगितले म्हणून. आणि गुरुला तरी कोणी सांगितले? त्याच्या गुरुने. ब्रह्म म्हणजे नेमके काय ? ते कोणालाच माहीत नाही. पण तरी सुद्धा काही तरी आहे नक्की, व तेच केवळ सत्य आहे हे ही नक्की. कसली बथ्थड चर्चा आहे ही? या असल्या विचारसरणी मुळेच "विचार विश्वात" सुरुवातीला जगाच्या खूप पुढे असून सुद्धा नंतर आपण मागे पडलो.
१८०० या दशकात पाश्चात्य शास्त्रज्ञांना असा प्रश्न पडला होता, कि प्रकाश जर तरंग (वेव्हस) आहे, तर सूर्या पासून आपल्या पर्यंत निर्वात पोकळीतून मधून हे तरंग कसे प्रवास करतात? कारण तरंगांना प्रवास करण्या करता काही तरी माध्यम लागते. जेव्हां काहीही स्पष्टीकरण सापडेना तेव्हां त्यांनी अशी कल्पना मांडली कि ज्या अवकाशात निर्वात पोकळी नाही. संपूर्ण अवकाश एका द्रव्याने व्यापलेले आहे. व या द्रव्यातून तरंग प्रवास करतात. या द्रव्याला त्यांनी "इथर" असे नांव दिले.
पण काही लोकांना ही कल्पना मान्य नव्हती. जे थेट तर अनुभवता येत नाहीच, पण त्याच्या असण्याचा काही अप्रत्यक्ष पुरावा पण सापडत नाही, त्याचे असणे केवळ एक सोय म्हणून मान्य करणे, हे त्यांना पटत नव्हते. १८८७ साली मायकेल्सन व मोर्ले या दोन शास्त्रज्ञांनी इथर खरोखर असेल तर त्याचे अस्तित्व सिद्ध करण्या साठी एक प्रयोग केला. भौतिक विज्ञानाच्या प्रगतीच्या टप्प्यात हा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रयोग मानला जातो. या प्रयोगा अंती असे सिद्ध झाले कि "इथर" असे काहीही नसते. मग प्रकाश लहरी निर्वात पोकळीतून आपल्या पर्यंत कश्या पोहोचतात? त्याचे उत्तर सापडायला अनेक दशके जावी लागली. पण, प्रकाश लहरीनिर्वात पोकळीतून आपल्या पर्यंत कश्या पोहोचतात हे सांगता येत नाही, म्हणून इथरचे अस्तित्व त्यांनी मान्य केले नाही.
आधुनिक विज्ञानातील काहीही संशोधन आपल्या कडे का झाले नाही? कारण आपल्याला प्रश्नच पडत नव्हते. एकदा का "ब्रह्म" म्हणून काही तरी आहे व ते सत्य आहे, हे मान्य केले, कि सर्व प्रश्न बाद होतात,