प्रतिसादांचाच का, एकूणच मनोगत येथे लेखक, वाचक, व प्रतिसाद लेखक, सगळ्यांचाच दुष्काळ आहे. व हे आत्ता आत्ताचे नाही, बऱ्याच काळा पासून आहे. अलिकडच्या लिखाणाचे विश्लेषण केल्यास असे दिसते कि अनेक लिखाण लेख फक्त तीन विषयां वर होते. मोदी/भाजपा ला फटके - लेख मोजकेच पण प्रैसाद भरपूर; चिंता करी जो विश्वाची - लेख अनेक पण प्रतिसाद मोजकेच; आणि अष्टावक्र. आणि त्यात पण लिहिणारे मोजकेच. (आणि वाचणारे ? ) हे लिखाण काढून घेतले तर काय उरते ? म्हणून मी मागचे दोन लेख मराठीसृष्टी येथे प्रकाशित केले. त्यांची लिंक येथे देण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जमले नाही. दोन्ही लेख कॉपी पेस्ट करीत आहे.