शिष्य म्हणतो इतक्या वर्षात त्याला स्व गवसला नाही आणि रमण त्याला सांगतात तू माझ्यावर भरवसा ठेव ! 

आता यात नक्की काय लफडा आहे ?  रमणांची एकमेव साधना आहे " मी कोण " या प्रश्नाचा सातत्यानं वेध घेणं.  या साधनेचा घोळ असा की शिष्याला  नक्की काय करायचं याचा पत्ता नाही. रमण स्वतः अचानक सिद्ध झालेले त्यामुळे त्यांचा सायकॉलॉजीचा पुरेसा अभ्यास नाही. तस्मात, शिष्य अडकलेत कशात आणि आपली साधना त्यांना मुक्त कशी करेल याची संगती त्यांना लागत नाही. उगीच गार्ड, स्टेशन,  दारं-खिडक्या बंद करून झोपणं यानं भानगडी वाधत जातात आणि पुन्हा शिष्याची परिस्थिती जैसे थे !

शिष्याला पहिल्यांदाच सांगितलं की तू स्वतःला स्खलनशील, महापातकी वगैरे व्यक्ती समजतोयस हाच एकमेव अडथळा आहे ! हा गैरसमज आता या क्षणी सोडून दे.  जे काही तुझ्या आयुष्यात घडतंय त्याचा तू जाणता आहेस आणि हे जाणणं सर्वथा अनाबाधित आहे. त्या जाणण्याला काहीही लेपन होऊ शकत नाही. प्रश्न मिटला !