शिशिर,

'शेर' बाजारा बद्दल सर्वसामान्याच्या मनांत जंगलातल्या 'वाघोबा' इतकिच दहशत असते ही गोष्ट खरी. पण त्यात तू म्हणतोस त्या प्रमाणे 'मागच्या पिढीचा दोष' नसून मध्यमवर्गीयांची आर्थिक असुरक्षिततेची भावना हे कारण आहे. सर्वसामान्यांकडे श्रीमंतांप्रमाणे गडगंज संपत्ती नसते. आहे त्याच तुटपुंज्या गंगाजळीत सर्व सोंगं वठवायची असतात. त्यांना आपल्या गंगाजळीत 'सुरक्षित'रित्या वाढ करायला नक्कीच आवडतं. पेपरातून वाचनात येणारी शेअर बाजारातील डोळे फाडून टाकणारी उलाढाल, ते अगम्य तर्क-कुतर्क, तथाकथित 'जाणकारांची' अनाकलनिय विश्लेशणं ह्यांनी भांबावलेल्या सर्वसामान्याला आपली 'स्वकष्टार्जित' चिमुकली गंगाजळी या वाघांसमोर ('शेरा' समोर) ठेवण्याचे धाडस होत नाही. या वाघांनी आपल्या गंगाजळीचा फडशा पाडला तर? (शेअर्स मध्ये पैसे बुडाले तर?) ही भिती असते.

त्यांना आंजारून-गोंजारून त्यांची भिती घालविण्यास मदत होणार असेल तर जरूर जरूर तशी लेखमाला सुरू कर. आमची भिती दूर होऊन कनवटीला दोन पैसे जास्त लावता आले तर धन्य होऊ.

होऊन जाऊदे सुरुवात.... लेख तर फुकटचेच आहेन नं..... मग आम्ही ते वाचायला अजिबात घाबरणार नाही.

शुभस्य शिघ्रम्.