मी मराठी,
 मी आपल्याशी सहमत आहे. मी पूर्वी असेच विचार मांडले आहेत. पण आपण जितकी मुद्देसूद आणि तर्कशुद्ध मांडणी केली आहे तितकी मला जमली नव्हती.
   मला वाटते केंद्र सरकार जिथे मऊ लागते तिथे कोपराने खणते आहे. तमिळ लोकांचा कडवा विरोध बघून तिथे नमते घ्यायचे आणि मराठी लोकांचा दुबळेपणा हेरुन तिथे हिंदी लादायची. 
   हिंदी ही एक स्ट्रीट लँग्वेज बनली आहे. खुद्द हिंदी भाषिकांना तिच्याबद्दल कमीपणा वाटतो असे वाटते. समस्त सिनेतारका आणि तारे सिनेमात हिंदी बोलत असले तरी पारितोषिक सोहळा, मुलाखती ह्यात हटकून इंग्रजी हाणतात.
पुस्तकी हिंदी सक्तीने मराठी लोकांवर लादायची गरज नाही. ज्याला गरज आहे तो ती बोलीभाषा म्हणून शिकेल असे धोरण ठेवावे. इंग्रजीचे तसे नाही. त्यातील प्रचंड ज्ञान शिकायला ती भाषा येणे आवश्यक आहे. उदरनिर्वाह नीट होण्याकरता इंग्रजीला पर्याय नाही. हिंदीला एकमेव राष्ट्रभाषा बनवायचे सरकारकडे नीट धोरण नव्हते. दक्षिणेतील विरोधामुळे ते होईल असे वाटत नाही मग आपण आपल्या भाषेला का कमी महत्त्व द्यायचे?

आपले मुद्दे अत्यंत योग्य आहेत. हिंदीचे समर्थक बहुतांश भावनेला हात घालणारी वक्तव्ये/मुद्दे मांडत आहेत. त्याला तर्काचे पाठबळ नाही असे माझे मत. कळावे.