कायदे हे मानवनिर्मितच आहेत ना? मग ते बनवताना कोणते आधार घेतले जातात? स्थळ-काळ,प्रसंग आणि व्यक्तिसापेक्ष निर्णय बदलू शकतात असे गृहीत का धरू नये ? आणि तसे दिले गेलेले निर्णय त्या चौकटीतच का तपासले जाऊ नयेत ?

लोकशाहीत जर एखादा कायदा कालबाह्य झाला असे समाजातील बहुसंख्य लोकांना वाटू लागले तर आणि तेंव्हा तो बदलला जाऊ शकतो. परंतु जोवर तो अस्तित्वात आहे तोवर न्याय-निवडा त्याच्यानुसारच व्हावा लागतो.'स्थळ-काळ,प्रसंग आणि व्यक्तिसापेक्ष निर्णय बदलू ' लागले तर अराजक माजेल! तेंव्हा दिलेले निर्णय अस्तित्वात असलेल्या चौकटीतच तपासले गेले पाहिजे.

मिलिंद