1. प्रत्येक मराठी माणसाच्या घरी एक तरी दैनिक, मासिक आले पाहिजे.
  2. प्रत्येक मराठी माणसाने आजुबाजूच्या मराठी शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  3. आपल्या घराचे, सदनाचे, सदनिके चे, प्रासादा चे नांव आवर्जुन मराठी मध्ये लिहले पाहिजे.
  4. घरामधे आपले स्वताचे  एक  छोटे से वाचनालय बनविले पाहिजे.
  5. आपल्या आजुबाजूला असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरेपूर लाभ घेतल पाहिजे.
  6. आपल्या संपर्कात येना-या व्यक्ति शी आवर्जून मराठी मधे बोलले पाहिजे.
  7. आपल्याला संत, पंत आणि तंत कवी यान्च सम्रूध्द असा वारसा लाभलेला आहे. आपण किमान १००/१५० ओव्या, पोवाडे, ष्लोक, कवीता यांचे अवांतर पाठांतर केले पाहिजे.
  8. नाटके, कथा, कादंब-या यान्चे घरामधे बसुन सामुहिक वाचन करुन रसास्वाद घेतला पाहिजे.
  9. आपण आपले अनेक सणवार साजरे करीत असतो, जसे गौरी, गणपती, सन्क्रांत, तीळ-गुळ वगैरै. त्यामधे आवर्जुन पणे आपण ईतर परप्रांतियांना याना सामील करुन घेतले  पाहीजे.
  10. महाराष्टीयन माणुस त्याचे सहकार्यशील प्रतिमेबद्दल कधीही प्रसिध्द नव्ह्ता. परन्तु आता मात्र त्याने आपली प्रतीमा बदलण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला पाहीजे .
  11. आपल्या भोवताली अनेक सभांरंभ होत असतात, त्यामधे आपण उत्साह आणि मनपुर्वक सहभाग घेतला पाहिजे, अगदी, तन-मन-धनाने.

जय महाराष्ट्र.

द्वारकानाथ.