आपली लेखमाला आवडली. मनोगतावर सर्व रसांचा आस्वाद घेता येतो हे आमचे भाग्यच म्हणायचे. पुढील लेखांसाठी शुभेच्छा.
एक शंका-
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥
नामाच्या द्वारे ज्याची वृत्ती विष्णुरूप झाली अशा वैष्णवालाच या नामामृताचे सेवन करण्याचे भाग्य प्राप्त होते.
वैष्णवच का? ज्ञानेश्वरांनी वैष्णव शब्द जाणीवपूर्वक वापरला असावा. भक्तीमार्गात आणि त्यातही नामस्मरणात वैष्णव-शैव भेद असण्याचे काय कारण असावे?
-अ