ज्ञानदेवांच्या काव्यप्रतिभेबद्दल आणि शब्दसंपत्तीबद्दल माझ्या मनातही आदर आहे.

अध्यात्म हेही एक शास्त्र आहे.येथे केवळ कल्पनाविलास आणि काव्यप्रतिभा ह्यापेक्षा ज्ञानाला अधिक महत्व असावे असे वाटते.दुसऱ्या अभंगाच्या निरुपणात मी abstract- research article चा संदर्भ म्हणूनच दिला आहे.
ज्ञानदेव सुरूवातीलाच २ऱ्या अभंगात वेद-शास्त्रे आणि पुराणांचे दाखले देतात. या संदर्भांचा विचार केला तर केवळ कवी कल्पना ह्याला हरिपाठात स्थान नसावे असे वाटते.तुकाराम महाराजांचाही अभंग आहे.
डोई वाढवूनी केश । भूते आणिती अंगास । तरी ते नव्हती संतजन । तेथे नाही आत्मसुख ॥
यावरून असे वाटते की तेव्हाच्या समाजात अशा विचारसरणीचे लोक असणार. काही ग्रंथात असा उल्लेखही आढळतो. माझ्या काही मित्रांशी बोललो असता त्यांचेही मत ह्याला पूरकच होते.

मला तसा अनुभव कधी आला नाही. म्हणून मग दुसऱ्या अंगाने विचार केला.

कदाचित दोन्हीकडून विचार केला तरी नामस्मरण करायला समाज प्रवृत्त होईल आणि ते फायद्याचेच होते. मनात असलेली भीती ह्याला कारणीभूत असावी.भीती आणि कल्पना ह्यातून भूत ही संकल्पना जन्मास आली असावी का?