"ज्वलंत" विषय म्हटल्यावर मला वाटलं गोळेंनी तंदूर, टिक्का वगैरे बद्दल लिहिलं असेल. पण टिक्का नाही तर टीका वाचायला मिळाली.

आमचं म्हणाल, तर मातोश्रींच्या हातच्या वरणभाताची सर अजूनही कशाला आलेली नाही. पण "बदल" म्हणून 'सृष्टी' मधली तंदूर सुरमयी आमची संध्याकाळ "सुरमयी" करून जाते ! (सृष्टी पुणेकरांसाठी बरं का ! अधिक माहिती साठी वैयक्तिक संपर्क साधावा. 'अश्या' माहितीची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहोत !)

मला वाटतं प्राथमिक शाकाहारच असावा. पण प्रासंगिक मांसाहार बऱ्याच कारणांनी उत्तम ठरतो. त्यात पल्याड गेल्यावर कमी हाल होतात.

आम्ही 'हम आपके है कौन' बघून भूक लागणारे... अहो किती खातात हे लोक ? खवैय्यांना मिश्राहारच आवडणार ! 'बेस्ट ऑफ़ बोथ वर्ल्डस' कधीही उत्तम !