भास्कर (ले. आणि के.), श्रावणी,मृदुला,
कवितेला दिलेल्या भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी. खरे सांगायचे झाले तर,
"तुम्हा सर्वांच्या प्रेमाने आले मन भरुन,
कवयित्रीकडे नाही,काव्यविषयाकडे जातो सर्व मान!"
विषय 'लग्न'..तुम्हा आम्हासर्वांच्याच गोडीचा..कोणी खाल्लेला तर कोणी न खाल्लेला पण सर्वांच्याच पंगतीत एकदा तरी वाढला जाणारा हा लाडू..
वेदु,तु काल उत्तर दिले नाहीस तेव्हाच मला कळले कि मला एक छान कविता उत्तरादाखल मिळणार..आणि सोनालीची कविता हा अजून एक सुखद धक्का..मनोगत वर प्रतिभावंत कवी-लेखक आहेत..
पण मला असे वाटते कि या कविता तुम्ही नवीन लेख म्हणून पण उद्धृत कराव्यात..म्हणजे सर्वानाच आनंद घेता येइल..
(सद्गदित)अनु.