ज्या विकासाच्या राक्षसाने माझं छोटंसं टुमदार गाव केव्हाच गिळून टाकलं..
विकासात वृक्षतोड वा मानवाला निसर्गापासून दूर नेणे अपेक्षित नाही. (तसे असेल तर हा विकास नव्हे!) या पुढील विकासाचा टप्पा (विकसित देशात) पर्यावरणाचा समतोल हाच आहे.
विकास हा राक्षस नसून या मागे भ्रष्टाचार व लोभ हे सैतान आहेत हे
निदर्शनास आणून द्यावेसे वाटते. कोणताही प्रकल्प सुरू करण्याआधी त्याच्या
पर्यावरणावर होणारा परिणाम अभ्यासणे व त्यावर उपाय योजना करणे बंधनकारक
आहे. असे असतानाही या सगळ्यांकडे होणारी डोळे झाक या मागे हेच दोन सैतान आहेत.
सध्या त्याहीपेक्षा गंभीर व समोर उभ्या ठाकलेल्या
(भूकबळी,
बेरोजगारी, गरीबी, जातीय वैमनस्य, धार्मिक तेढ) या समस्यांना तोंड
देण्याच्या सरकारी प्रयत्नात (जर तसा प्रयत्न
असेल तर! जर हेही मुद्दे गौण असतील तर पर्यावरणाला विचारतो कोण!)
या सारख्या
मुलभूत परंतू दुरगामी दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले जाते असेही
वाटते.