शहरीकरणाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. तुम्ही उल्लेखिलेले हे तोटे पुण्याच्या शहरीकरणाचेच आहेत. आता तुम्हाला पुण्यात बहुराष्ट्रीय कंपन्या हव्या, पैसा हवा, सर्व शहरी सुविधा हव्यात, मग हे 'साईड इफेक्ट्स' त्याबरोबर येणारच की हो ! त्याची तयारी हवीच. आम्हाला आखूडशिंगी आणि बहुदुधी गाय अशी कशी मिळेल? जर शहराचा टुमदारपणा जपायचा असेल तर शहरीकरणाच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आता एवढ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, त्याबरोबर पुण्यात तेवढा पैसा गुंतवला गेला, आपोआप लोकांचा ओघ वाढला, परंतु याबरोबरच, पुण्यात चांगली परिवहन सेवा सुरू झाली, रस्ते सुधारले, अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या ना? मग त्याबरोबर काही वाईट घडले असेल तर तेही स्वीकारायला हवे. याउलट त्यापैकीच काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये बसून काही लोक त्यांना नावे ठेवत आहेत.
आता हे जर घडले नसते, तर पुण्याचे टुमदारपण राहिले असते, पण पुणेरी माणूस 'पुण्याकडे दुर्लक्ष केले' म्हणून ओरडत राहिला असता(आजही काही 'टुमदार' शहरांची अशी ओरड आहेच ना!). म्हणजे दोन्हीकडून बोंब मारायची. असे कसे चालेल?
--ध्रुव