अदितीताई,

आपल्याशी सहमत आहोत.

पण आपण मांडलेल्या मुद्द्यात सामान्य लोकांचा तितकाच सहभाग आहे असे वाटत नाही का?

कोकाकोला/पेप्सी यांचा माल विकतो म्हणूनच ते बनवतात ना?

धनकवडी परिसरात काही ठिकाणी दोन इमारतींमध्ये अक्षरशः ५ फुटांचे अंतर आहे, हे सामान्य लोकांनी चालवून घेतलं म्हणूनच झाले ना?

फक्त कोणी व्यक्ती/संस्था मनमानी करते असे म्हणून चालणार नाही, आपण ती चालवून घेतो असे सुद्धा म्हणावे लागेल असे वाटते.

टेकड्यांवरचे आरक्षण उठवू नये असा वाद चालू असतानाच, कुलकर्ण्यांनी 'विश्व' बांधले. तिथे सगळ्या सदनिका विकल्या गेल्या आहेत, आणि मुख्यत्वे मराठीवर्गाने घेतल्या आहेत. कुलकर्ण्यांना ग्राहकच मिळाले नसते तर 'सप्तसुर' (इथे 'सुर' का 'सूर'?) नावाची उपयोजना बांधायला तरी घेतली असती का? ते जाऊद्या, मुख्य योजना मार्गी तरी लागली असती का?

हो, पण विश्वचे एक उत्तम आहे, त्याच्या गच्चीतून सिंहगड आणि पर्वती दोन्ही सुस्पष्ट दिसते बरं का! आणि तसे म्हणावे तर 'विश्व' टुमदार सुद्धा आहे.

आता या 'वैश्विक' उदाहरणावर पुणेकरांनी काय बोलावे?...आपलेच दात आणि आपलेच ओठ!