सार्वजनिक परिवहनाचा अधिकाधिक लोकांनी उपयोग करायला हवा. त्यांना त्यासाठी
उद्युक्त करायला हवे. जिथे शक्य तिथे पायी जावे. पायी जाणे शक्य नसल्यास
सायकलने जावे. तेही शक्य नसल्यास बसचा उपयोग करावा, या मताचा मी आहे.
चारचाकी गाडीत एकटे बसून प्रवास करणे माझ्यामते पर्यावरणविरोधी आहे.
गुन्हा आहे. या गाड्यावंर प्रदूषण कर लावण्यात यावा. शहरातील काही
भागांमध्ये चारचाकी गाड्यांना प्रवेश नसावा.
आधी धनदांडग्यांचे अवैध निर्माण पाडण्यात यावे. मग पर्वतीपरिसरातील
झोपड्यांचे पुनर्वसन व्हावे. दिल्लीत सध्या जशी कारवाई हायकोर्टाने केली
आहे तशी झाली तर उत्तम.