आदितीताई,
तुमची तळमळ समजली तरी पुणेकर आणि अपुणेकर मुद्द इथे अप्रस्तुत आहे.
विकासाचे धोरण चुकते आहे. महाराष्ट्रात अनेक शहरे विकासापासून वंचित आहेत. लातूर, सोलापूर, जळगाव, धुळे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांना विकासापासून दूर ठेवले जात आहे. फक्त आपल्याकडेच नाही, तर इतर राज्यातही एखाद दोन शहरेच प्रगती करतात, इतर राज्य (उद्योगधंद्यांच्या दृष्टीने) अविकसितच असते. अशा वेळेस जिथे संधी असेल अशा जवळच्या आणि सोयीच्या शहराकडे सगळ्याच गरजूंचा ओघ वाढतो. त्यातून शहराची अमर्याद वाढ होते, झोपड्या वाढतात.
अर्थात, हे तुम्हाला माहिती आहेच. मी अधोरेखित करण्याचे कारण इतकेच की, पुणेकर आणि अपुणेकर हा वाद वाढू नये. तो चर्चेसाठी अहितकारक ठरेल !
बाकी, सॉफ्ट्वेअर उद्योगाला पुणेच ( किंवा कोणतेही मोठे शहर) का हवे असते कळत नाही ? मराठवाड्यात अथवा खानदेशात इंटरनेटची मोठी लाईन टाकून, तिथे कंपनी सुरु केली तर ती जास्त स्वस्तात होणार नाही का ? शिवाय, तिथला विकास होईल व पुणे मुंबई या शहराकडचा ओघ कमी होईल. आता तर बहुतांश कामे सॅटेलाईटमार्फत होतात, तेंव्हा फिजिकल लाईनचीही आवश्यकता नसते.
विकासाला दिशा नाही, हे खरे ! सामान्य माणूस जिकडे पोट तिकडे जातो.
तुमचे इतर मुद्दे योग्यच आहेत.