माझी आकलन शक्ती फार चांगली नाही असे आपण सुचवत असाल तर आनंद आहे.

पण वनस्पतीला आकलन शक्ती नसते हे आपण कसे ठरवले? हिरव्या वनस्पती ज्या दिशेला प्रकाश असेल त्या दिशेला वाढतात हे आकलनाशिवाय होते का? धान्याला ओल मिळाली की मोड येतात, कोरडे ठेवलेले धान्य मोड बनवत नाही हे आकलन नाही का? झाडांची मुळे पाण्याच्या दिशेला वाढतात हे आकलन नाही का?

तेव्हा वनस्पतीला आकलन नसते हे म्हणणे साफ चूक आहे. प्राण्यांपेक्षा कमी असते म्हणता येईल. तसे सर्व प्राण्यांमधे आकलन सारखे नसते. आपले एक उदाहरण सोडा पण कोंबडी वा माशाची बुद्धी माणसापेक्षा बरीच कमी असते. 

 शाकाहार व मांसाहार हे भावनिक मुद्दे आहेत. इथे शास्त्रीय वगैरे काही नाही. हिंदू लोक गाईला देव मानतात आणि खात नाहीत पण ते उकिरडा फुंकणारी गाय आणि गोठ्यात राहून सकस चारा खाऊन दूध देणारी गाय ह्यात फरक करत नाहीत. मुस्लिम लोक डुक्कर त्याज्य मानतात पण तेही गटारात लोळणारे डुक्कर आणि एखाद्या अद्ययावत फार्मवर पाळलेले, पोसलेले डुक्कर सारखेच त्याज्य मानतात. तेव्हा इथे शास्त्र कशाला घुसडता?

 आपण ह्याचा पुरावा द्याल का की सर्व प्रकारचा शाकाहार एकाच प्रकारात मोडतो? किंवा सर्व प्रकारचा मांसाहार एकाच गुणधर्माचा असतो?