असं काय करता चक्रपाणिराव..

अहो ,

....(किंवा स्वतः अमेरिकेत बसून पुण्याच्या विकासाचा खरा मार्ग कोणता यावर मते ठोकावीत!!!!)(हे सुद्धा हलकेच घ्या मंडळी!)

या वाक्याला पु लंच्याच 'तुम्हाला कोण व्हायचंय मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर'लेखाचा या  संदर्भ आहे. त्यात म्हटलंय "पुणेकराला कुठल्याही विषयावर मत ठोकायला आलं पाहिजे..उदा. अमेरिकेची आर्थिक आघाडी नीट बसवण्याचा खरामार्ग कोणता या विषयावर आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला हे विसरून मत ठोकता आलं पाहिजे"  

अहो हा टोला मुंबईकरांना नव्हताच मुळी!!!(ते सांप्रत कुठ्ल्याही शहरात/देशात निवास करत असले तरीही...) उगाचच संदर्भ न पाहता कोणालाही अहेर करत जाऊ नका चक्रपाणिराव....
त्यातून पुणेकरांकडे शालजोडीतले (जोडे) आणि नथीतून शरसंधान करायचे शर असल्यामुळे त्यांना शिखंडी ची गरज भासत नाही. मुंबईकरांच्या खुल्या दिला बद्दलत्यांचे आभार.  पुणेकरांनी मारलेल्या तीराचा रोख जरा लक्षात घ्या(अन्यथा पु लंचे लिखाण नीट वाचा. आणि हो. पुलं शेवटी म्हणजे त्यांची मौत आल्यावर पुण्यात आले नाहीत. त्यांनी पुण्यात माझ्या माहितीप्रमाणे १५ वर्षांपेक्षा जास्त काळ आनंदात घालवला आहे. एरवीही ते येऊनजाऊन पुण्यात असायचे. आणि पुणेकरांची त्यांनी उडवलेली खिल्ली पुणेकरच रसिकतेने ऐकतात आणि त्यांच्या ध्वनिमिद्रिका काढणारे सुद्धा पुणेकरच आहेत हे ध्यानात घ्या.. )

परंतू मूळ चर्चेचा मुद्दा हा नाही आणि इथे मुंबईकर-पुणेकर वाद घातला जाऊ नये ही विनंती आहे. हे विषयांतर होते आहे. आपण मुंबईकर-पुणेकर-पुण्याचा अभिमान यासाठी निराळी चर्चा सुरू करू. या.

कृपया राग मानू नये,
लोभ असावा
-- आपली  अदिती