अदितीताई,

अहो, शालजोडीतून जोडे देणारे पुणेकरच हे कबूल केलेत तुम्ही, हो की नाही? मुंबईकरांना आहेराच्या वेळी आहेरच करण्याची आणि जोडे हाणताना जोडेच हाणण्याची सवय आहे हो!! आणि अमरिकास्थित मंबईकरांविरुद्ध तुमचा मुद्दा नाही तर पुणेकर असणे, पुणेकरांची खिल्ली उडवली जाणे, पु. लं. चे पुण्यातील वास्तव्य इ. प्रांतिक भावनांशी निगडीत अवांतर गोष्टी चर्चेत आणण्याची गरज काय होती हे म्या अडाण्यास कळले नसावे बहुतेक.

हलके घेण्याची मला सवयच आहे हो. तुम्हाला कितपत जड पेलवते हे माहीत नसल्याने माझे फावले/फावत असावे. माझ्या दृष्टीने अजूनही हा चर्चेचा मुद्दा नाही. पण प्रांतिक भावना चर्चेत आल्याच/येणार असतील तर व्य. नि. ची पळवाट धरणे आणि वरून त्यास "तारतम्य" हे गोंडस नाव देणे हे (पुण्याचे पाणी असेल!!), मुंबईचे पाणी नाही. मला मुंबईचे/अमेरिकेचे/पुण्याचे पाणी चाखण्यात/चाखवण्यात स्वारस्य मुळीच नाही आणि हे मला येथे शेवटचे सांगू द्यायचे की पुन्हा संधी द्यायची/च्या हे चर्चेच्या येत्या वळणावर ठरेलच.

लोभ असावा (राग नसावा तुम्ही म्हटलेच आहे, पण तेथे लोभ दिसत नाही, म्हणून इकडे दाखवतोय!!)
-- आपला चक्रपाणि

ता.क.

निळ्या ओळींतील मुद्द्यांवर आपले बोलणे होऊन त्यात मी आपल्याला माझी मते ऐकवल्याचे मला आठवते आहे. आपल्या आठवणींना उजाळा दिल्यास याची खात्री पटू शकेल. चर्चेतील रिडंडन्सी वाढावी अशी तुमची इच्छा असल्यास जरूर कळवा, म्हणजे मला निळ्या ओळींबद्दल माझी मते पुन्हा/नव्याने मांडता येतील.