निरंजन महोदय, तुमच्या विचारांशी मी सहमत आहे. एकूणच आजकाल या व्यासपीठावर शासनाला आणि इतर सार्वजनिक व्यवस्थांना नावे ठेवणाऱ्या चर्चा वाढल्या आहेत. केवळ बाजूच्या चर्चांच्या रकान्यावरून नजर फिरवा, अशाच प्रकारच्या बऱ्याचशा चर्चा चालू असल्याचे दिसेल. या चर्चा देखील कोणाच्याही ज्ञानात भर घालणाऱ्या नाहीत का विचारांना चालना देणाऱ्या नाहीत (तशा चर्चांना फार कोणी प्रतिसाद देत नाही). अशा गप्पा मारून केवळ time-pass होतो आहे.
--ध्रुव.