बऱ्याचश्या (सर्व नाही) मांसाहारी लोकांना एक सवय असते, आपल्या शाकाहारी
मित्राला/मैत्रिणीला विचारायचे तू का "खात" नाहीस, आणि काही कारण ऐकले की
ते कसे चुकीचे आहे हे सांगायचा प्रयत्न करायचा किंवा भाज्या आणि मांस
सारखेच आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. याचे कारण काय असावे बरे?
बऱ्याच लोकांना (साऱ्यांना नाही) आपण मांसाहार करून काहीतरी चुकीचे करतोय
अशी आंतरिक टोचण असते (ती सामाजिक कारणांमुळे असेल) त्याचे समर्थन करून ती
टोचण कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न काहीजण (सर्व नाही :) करत असतात. हेच
काही (सर्व नाही) शाकाहारी लोकांनाही लागू आहे,
इति शशांक