जर का कोणी 'व्हेजी-नाझी' बनून तुमच्या मागे लागला नाहीये तरीसुद्धा त्या माणसाचा पिच्छा पुरवून "तू एकदा तरी खायला हवेच!", "एकदा खाऊन बघ, प्रेमात पडशील", "समजा अमक्या अमक्या प्रदेशात तू अडचणीत सापडलास तर खाशीलच ना? मग एरवी खायला काय हरकत आहे?" इ.इ. अनेक प्रकारे हल्ला चढवला जातो.

वेदश्रीताईंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या बरोबरच हे आणि असे प्रश्न विचारणाऱ्यांची मानसिकता समजू शकेल का? केवळ आणि केवळ वरीलप्रकारे विधाने करणाऱ्या मांसाहाऱ्यांनाच (सर्व मांसाहाऱ्यांना नाही) माझा प्रश्न आहे.