ताजमहाल अर्थात तेजोमहालय हे सात मजली संगमरवरी नदीतीरावर घाटासकट बांधलेले शंकराचे देऊळ आहे. त्याची संरचना आणि आराखडा अर्थात आर्किटेक्चर हे वैदिक वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. आणि त्याला समांतर वास्तू (सातमजली वास्तू, जमिनीखाली ३ आणि वर ३ मजले, नदीकिनाऱ्यावरचे घाटासहित बांधकाम, पूरनियंरण व्यवस्था इ. ने युक्त) जगात फक्त भारतातच आढळतात.
पण हे सगळं जेव्हा एका गोऱ्या साहेबाने सांगितलं तेव्हा त्यात तथ्य वाटायला लागलं आहे आपल्याकडच्या लोकांना. भारतीय लोक जेव्हा हे सांगतात तेव्हा ते वेडे म्हणवले जातात.
जो आपलाविसरतो इतिहास त्याला इतिहासजमा व्हावेच लागते कारण अस्तित्व इतिहासाच्या पायावर उभे असते. आपल्या देशात इतिहासाचे दररोज धिंडवडे निघत असतात. ऐतिहासिक कागदपत्रे विस्तवात जाळली जातात. पाश्चात्य लोक येऊन संशोधनाच्या नावाखाली वाट्टेल ते निष्कर्ष काढतात आणि मग आपलेचलोक भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची नासधोस करतात....
या देशाचे भवितव्य आपल्या हातात घेण्यासाठी देवही(असला तर) कचरेल .
असो. तात्पर्य हे आहे की ताजमहाल हे शंकराचे देऊळ आहे आणि जेत्यांनी लिहिलेला आपला खोटा इतिहासच खरा हे आपण मानून भांडतो आहोत.
--अदिती