मला वाटते मी मान्डलेल्या मुद्द्यान्शी तुम्ही गल्लत करत आहात.

प्रश्न इथे इतिहासाच्या अचूकतेचाच आहे. सहिष्णुतेचा नाही.

ओकान्च्या दाव्यात तथ्य असते तर सर्वोच्च न्यायालयाने त्यान्चा दावा का खोडून काढला असता? तुम्ही दिलेली मथुरा, पुणे इ. उदाहरणे खरी आहेत हे "सिद्ध " झालेले आहे. ताज महालाच्या बाबतीत ते सिद्ध झालेले नाही. मुस्लिमानी जगभर आक्रमणे केली व तेथील धर्मस्थाने व सन्स्कृती नष्ट करण्याचे कार्य केले ही तर जगजाहीर व सिद्ध झालेली गोष्ट आहे. युरोपतील मध्ययुगीन क्रुसेड्स हीच बाब अधोरेखित करतात.  मुस्लिम त्यान्च्या विशिष्ट धर्मरचनेमुळे कायम असुरक्षितच राहिले आहेत व राहतील. ( हमीद दलवाईचे मुस्लिम मनाचा शोध हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा.) हीच त्यान्ची असुरक्षितता त्यान्च्या अनेक कारवायाना कारणीभूत आहे. तेव्हा मुस्लिमानी हिन्दू धर्मस्थळान्चा विध्वन्स केला या मुद्द्यात नवीन काहीच नाही.

जेते हे त्याना अनुकूल अशाच पद्धतीनेच जित समाजाची रचना करणार हे तर उघडच आहे. आणि इतिहासही त्यातच मोडतो. शेवटी ही जगरहाटी आहे. त्यामुळे माया, अझ्टेक इ. सन्स्कृतीन्बद्दल हे होणारच आहे. तुम्ही उल्लेख केलेल्या मर्कोनी-बोस, शून्याधारित गणिती सन्कल्पना या पुन्हा शास्त्राच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्याबद्दल आता नव्याने आलेला भाजप-प्रणित कळवळा हा खोटा सान्स्कृतिक अहन्कार कुरवाळणे आहे. ( वैदिक गणित आता कितपत वापरले जाते? खुद्द भाजप वा सन्घ त्यान्च्यावर आधारून आपली आर्थिक गणिते करतात का? किती भाजपवाले वेदकालीन तत्त्वन्चे पालन करतात? सध्याची भाजपची धोरणे पाहिली तर हा पक्ष वेगाने कॉन्ग्रेसच्या दिशेने वाटचाल करतो आहे असेच म्हणावे लागेल. )

आता भाजप, ओक वा सन्घ यान्च्या विकृतीच्या मुद्द्याकडे वळू.

ओकानी त्यान्च्या लिखाणात ख्रिश्चन धर्म म्हणजे कृष्णनीति होय, वा बायबल चा उगम गीतेमध्ये सापडतो, वा मुहम्मद पैगम्बर हा हिन्दूच होता इ. दावे केलेले आहेत. ते दावे ते गेली अनेक वर्षे करत आहेत, पण त्यान्च्या दुर्दैवाने जगातील सर्वच लोक हे जेत्यानी शिकविलेल्या इतिहासला बळी पडलेले असल्याने ह्या महात्म्याला ते अजून सिद्ध करता आलेले नाहीत. मी स्वतः आयुर्वेदादि प्राचीन भारतीय वैद्यक व दर्शनशास्त्रे यान्च्याशी गेली काही वर्षे जवळून सम्बधित आहे. तेव्हा हे असले दावे कुठल्या न्यून्गन्डातून येतात याची मला पूर्ण कल्पना आहे.

तुम्ही ओकानी केलेली "कारणमीमन्सा" जर पाहिलीत तर तुमच्या असे लक्षात येईल की हे सर्व पुरावे केवळ शब्दान्चे खेळ आहेत. सन्स्कृत, हिब्रू, वा अरबी या प्राचीन भाषान्मध्ये असे phonetic variances आहेतच किम्बहुना ते अगदी स्वाभाविकच आहे. ( आज आपण मराठी, इन्ग्रजी, हिन्दी इ. भाषान्मध्ये अशी सरमिसळ झालेली पाहतोच की). पण रोम चा उगम राम या शब्दात आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करून काय होणार? ह्या सुतावरून थेट तेथे रामचन्द्राचे राज्य होते हा स्वर्ग गाठणे ही विकृती आहे. ओकान्च्या कुठल्याच दाव्याला सबळ ज्याला substantive evidence  म्हणता येईल असा पुरावा नाही. जवळजवळ सर्वच पुरावे हे शब्दच्छल या सदरात मोडतात.  इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ऐतिहासिक गोष्टीन्च्या बाबतीत कुठलाही पुरावा हा contextual असतो. तो तत्कालीन स्थलकालविशेष वा राजकीय, सामाजिक इ. सन्दर्भानेच घ्यायचा असतो. इतिहासाच्या बाबतीत हे तारतम्य विशेषत्वाने बाळगावे लागते. ओकान्च्या बाबतीत ते सुटले आहे असेच म्हणावे लागेल. ताजमहाल हे शिवमन्दिर होते हे सिद्ध करण्यासाठी  फक्त नामसाधर्म्य दाखविणे पुरेसे नाही. जसे त्यानी तेजाजी हा विसालदार, वा आग्रेश्वर शिवमन्दिर इ गोष्टी उल्लेखित केल्या आहेत. ओकान्कडे तगडा पुरावा नसल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने त्यान्ची बाजू उचलून धरलेली नाही; उलट ताशेरे मारले आहेत. ओकान्च्या ताजमहाल वा इतर दाव्यात तथ्य असते तर ही गोष्ट यदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई इ. इतिहासकारानी कशी ती उद्धृत केले नाही. ओकाना असे काय सापडले जे त्याना सापडले नाही? की सरकार, सरदेसाई वा इतर भारतीय इतिहासकार सुद्धा जेते-अनुकूल इतिहास प्रमाण मानत होते?

सन्घ, भाजप इ. सन्स्था गुजरात, एम.पी. इ. ठिकणी जेव्हा त्यान्ची राज्ये असताना शालेय पाठ्यपुस्तकात अनेक बदल केलेले आहेत. उदा. पृथ्वीराज चोहान ने महम्मद घोरीस मारले न की उलटे, वा येशू ख्रिस्त काश्मिरात मरण पावला, तो हिन्दूच होता इ. या उलट  गैरसोईच्या मुद्द्याना बगल दिलेली आहे उदा. गान्धी हत्या ( ह्याचा उल्लेखच त्यात नाही! )

केवळ भाजप व सन्घ हे हिन्दुत्वाचे स्वयन्घोषित कन्त्राटदार असल्याने त्यना हे सोयिस्कर असलेली महितीच फ़क्त पुढे येवू देतात. भाजप-प्रणित अनेक शाळान्मध्ये केवळ त्याना अनुकूल अशाच पद्धतीने इतिहासाचे पुनर्लेखन केले आहे. ( मुरलीमनोहर जोशीनी मागे ज्योतिष हे शास्त्र असून त्यात B.Sc.  ठेवावी असा फतवा काढल्याचा आठवते आहे का? ) हे तुम्ही उल्लेखिलेल्या " जेते हे त्याना अनुकूल अशाच पद्दतीने इतिहास रचतात " या मुद्द्याला बळ देणारे आहे. ( भाजप सत्तेवर येवून जेता झाला नसता तर हे सगळे शक्य होते काय?) ओकानी वा भाजप इ. नी ताज महालाची कार्बन डेटिन्ग टेस्ट कुठे व कधी केली याबद्दल अवाक्षर काढलेले नाही. हा सगळा प्रकार म्हणूनच सन्शयास्पद आहे.