>>मला वाटते मी मान्डलेल्या मुद्द्यान्शी तुम्ही गल्लत करत आहात.

गल्लत केलेली नाही. आपण आपलेच घोडे दामटायचा प्रयत्न करीत आहत.  कृपया माझी अंतर्भूत उत्तरे वाचा.

>>प्रश्न इथे इतिहासाच्या अचूकतेचाच आहे. सहिष्णुतेचा नाही.

सहिष्णुतेचा मुदा तुम्ही स्वतःच उपस्थित केला होता मी नाही हे कृपया लक्षात घ्या.

>>ओकान्च्या दाव्यात तथ्य असते तर सर्वोच्च न्यायालयाने त्यान्चा >>दावा का खोडून काढला असता? तुम्ही दिलेली मथुरा, पुणे इ. >>उदाहरणे खरी आहेत हे "सिद्ध " झालेले आहे. ताज महालाच्या >>बाबतीत ते सिद्ध झालेले नाही.

ताजमहालाच्या बाबतीत जर हे सिद्ध करायची संधी मिळाली असती तर आज आपण हा वाद घालत नसतो... ताजमहालाच्या बाबतीत अनेक गोष्टी तुम्हा-अम्हाला अर्थात सामान्य जनतेला प्रवेश-निषिद्ध आहेत. त्या उघडण्यात आल्या का? तिथल्या जमिनीखालील दोन मंदिरांचे कबरीत काय प्रयोजन आहे याचे उत्तर सर्वोच्च न्यायलय किंवा तुम्ही देऊ शकता का? ते मजले ६० सालापर्यंत दर्शनास खुले  होते. न्यायालयात याचिका दाखल केल्यावर अचानक ते बंद का करण्यात आले? सर्वोच्च न्यायालयात काय झाले हे मला माहीत नाही कारण कायदा हा माझा विषय नाही. पण या प्रश्नांची उत्तरे बाहेर आली का?

>>मुस्लिमानी जगभर आक्रमणे केली व तेथील धर्मस्थाने व सन्स्कृती >>नष्ट करण्याचे कार्य केले ही तर जगजाहीर व सिद्ध झालेली गोष्ट >>आहे.

हे 'सिद्ध' सत्य तुम्हीसुद्धा मान्य करता आहात. मग आपल्या इतिहासाची सत्यासत्यता पडताळून का पाहिली जाऊ नये? सर्वोच्च न्यायालय एवढा एकच मुद्दा अनेक पुराव्यांना उत्तर म्हणून फेकून कसे चालेल?

>>युरोपतील मध्ययुगीन क्रुसेड्स हीच बाब अधोरेखित >>करतात.  मुस्लिम त्यान्च्या विशिष्ट धर्मरचनेमुळे कायम असुरक्षितच >>राहिले आहेत व राहतील. ( हमीद दलवाईचे मुस्लिम मनाचा शोध >>हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा.) हीच त्यान्ची असुरक्षितता त्यान्च्या >>अनेक कारवायाना कारणीभूत आहे. तेव्हा मुस्लिमानी हिन्दू >>धर्मस्थळान्चा विध्वन्स केला या मुद्द्यात नवीन काहीच नाही.

माझा वर आलेला मुद्दा मी येथे परत एकदा मांडू इच्छिते की इतिहासाचे डोळस पुनरावलोकन का केले जात नाही? आज जो इतिहास आपल्याला आपला म्हणून ज्ञात आहे तो इंग्रजांनी लिहिलेला आहे ही गोष्ट लंडनमधे राहून आपण सोयीस्करपणे विसरता आहात. त्यामुळे हा तथाकथित 'इतिहास' संशयास्पद ठरत नाही काय?

>>जेते हे त्याना अनुकूल अशाच पद्धतीनेच जित समाजाची रचना >>करणार हे तर उघडच आहे. आणि इतिहासही त्यातच मोडतो. >>शेवटी ही जगरहाटी आहे. त्यामुळे माया, अझ्टेक इ. >>सन्स्कृतीन्बद्दल हे होणारच आहे.

असे म्हणून तुम्ही जेत्यांचे समर्थन करीत आहात. आता आपण गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत त्यामुळे एक सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या इतिहाचा अभ्यास व्हायला नको का? माय-अझ्टेक-इन्का संस्कृती नष्ट झाल्या. आपली संश्कृती अजून (तरी) जिवंत आहे. त्यामुळे जेत्यांचे समर्थन करून मी मांडलेल्या मुद्द्याला आपण बगल देऊ नका. 

>>तुम्ही उल्लेख केलेल्या मर्कोनी-बोस, शून्याधारित गणिती >>सन्कल्पना या पुन्हा शास्त्राच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या गोष्टी >>आहेत.

मला पण हेच म्हणायचे आहे की त्या शस्त्राच्या कसोटीवर पडताळून पाहण्याचे भाग्य आपल्याला मिळाले हे आपले सुदैवच. पण इतर गोष्टींची छाननी न करताच त्यांना चूक घोषित करून आपण आपलाच पूर्वग्रह दर्शवित आहत हे कृपया ध्यानात घ्यावे. 

>>त्याबद्दल आता नव्याने आलेला भाजप-प्रणित कळवळा हा खोटा >>सान्स्कृतिक अहन्कार कुरवाळणे आहे.

या कल्पनांबद्दल भाजप ने तथाकथित 'खोटा कळवळा' कधी दाखवला हे मला तरी समजू शकले नाही.

>>( वैदिक गणित आता कितपत वापरले जाते?

वैदिक गणित आणि आर्यभट्टांची शून्याधारित कल्पना यांच्यात मूलभूत फरक आहे कारण आर्यभट्ट हे वेदकालीन नव्हते तर इसवी सनाच्या निर्मितीनंतर ते होऊन गेले. कृपया ऐतिहासिक अवतर?णे देताना स्वतःच्या मनातील गोष्टी घुसडू नयेत.

>>खुद्द भाजप वा सन्घ त्यान्च्यावर आधारून आपली आर्थिक गणिते करतात का?

प्रश्न भाजपबद्दल चाललेलाच नाही. ताजमहालाबद्दल याचिका भाजप सत्तेत यायच्या आधीपासून दाखल केल्या जात आहेत. कृपया विषयाला फाटे फोडू नयेत.

>> किती भाजपवाले वेदकालीन तत्त्वन्चे पालन करतात? सध्याची >>भाजपची धोरणे पाहिली तर हा पक्ष वेगाने कॉन्ग्रेसच्या दिशेने >>वाटचाल करतो आहे असेच म्हणावे लागेल. )

आपले मत वाचून गंमत वाटली. सध्या भाजपनीती बद्दल कोणीही बोलत नाही. आपणच तो मुद्दा उपस्थित करून आपला व्यक्तिगत भाजपद्वेष इथे आणता आहात.

>>आता भाजप, ओक वा सन्घ यान्च्या विकृतीच्या मुद्द्याकडे वळू.

>>ओकानी त्यान्च्या लिखाणात ख्रिश्चन धर्म म्हणजे कृष्णनीति होय, >>वा बायबल चा उगम गीतेमध्ये सापडतो, वा मुहम्मद पैगम्बर हा >>हिन्दूच होता इ. दावे केलेले आहेत. ते दावे ते गेली अनेक वर्षे >>करत आहेत,

१. यात विकृतता कुठे आली?
२. ही पु ना ओकांची मते आहेत. इथे चर्चा ताजमहाला बद्दल सुरु आहे पु. ना. ओकांबद्दल नाही. या देशात ताजमहालाबद्दल इतरही अनेक लोकांनी लिहून ठेवले आहे ते लक्षात का घेतले जात नाही?

>> पण त्यान्च्या दुर्दैवाने जगातील सर्वच लोक हे जेत्यानी >>शिकविलेल्या इतिहासला बळी पडलेले असल्याने ह्या महात्म्याला >>ते अजून सिद्ध करता आलेले नाहीत.
मला वाटते आपल्या शंकेचे उत्तर आपणच इथे दिलेले आहे. अर्थात त्यातला उपहाचा भाग वगळून! आणि कृपा करून हे पुन्हा एकदा लक्षात घ्या की विषय ताजमहालाबद्दल चाललेला आहे आणि त्यांनी अशी विधाने केली म्हणून ते 'विकृत' ठरत नाहीत. जशी आपण आपली मते मांडता आहात तसा त्यांनाही त्यांची मते मांडण्याचा अधिकार या देशाच्या घटनेने दिलेला आहे. याचा अर्थ कानफाट्या असे म्हणून त्यांच्या सर्वच मतांना छ्हाननीच न करता चूक घोषित करवे असा होत नाही.

 

>>मी स्वतः आयुर्वेदादि प्राचीन भारतीय वैद्यक व दर्शनशास्त्रे >>यान्च्याशी गेली काही वर्षे जवळून सम्बधित आहे. तेव्हा हे असले >>दावे कुठल्या न्यून्गन्डातून येतात याची मला पूर्ण कल्पना आहे.

वेदांचा अभ्यास करूनही आपल्याला न्यूनगंड वाटत असेल तर अवघड आहे परिस्थिती. वास्तव हे आहे की वेद, आयुर्वेद, योगासने या गोष्टी पाश्चात्यांनी उचलून धरल्यानंतरच त्यांचे महत्त्व या देशाला पटले आहे.( मला त्यात बोलायचा अधिकार नाही पण नाडीपरीक्षेवर अचूक रोगनिदान करणारे लोक २०-२५ व्वर्षांपूर्वीपर्यंत भारताअत होते. ती विद्याक्ष दुर्लक्ष्लोप केल्यामुळेच  पावली ना? आज माझ्या पाहण्यात तरी अचूक नाडीपरीक्षा करून पॅथॉलॉजिकल टेस्टस न करायला लावणारे वैद्य कोणीही नाहीत. जर आयुर्वेद टाकाऊ होता तर इंग्रज इथे येईपर्यंत काय इथे लोक बरेच होत नव्हते काय? चरक-सुशृतांनी प्लॅस्टिक सर्जरी सुद्धा करून दाखवली होती हे आपल्यासारख्या जाणकाराला मी सांगावे लागू नये! तरीही आपणा म्हणता की वेदांचा अभ्यास करून न्यूनगंड येतो? असे कसे?)

>>तुम्ही ओकानी केलेली "कारणमीमन्सा" जर पाहिलीत तर तुमच्या >>असे लक्षात येईल की हे सर्व पुरावे केवळ शब्दान्चे खेळ आहेत. >>सन्स्कृत, हिब्रू, वा अरबी या प्राचीन भाषान्मध्ये असे phonetic >>variances आहेतच किम्बहुना ते अगदी स्वाभाविकच आहे. ( आज >>आपण मराठी, इन्ग्रजी, हिन्दी इ. भाषान्मध्ये अशी सरमिसळ
>>झालेली पाहतोच की).

आपण भाषाशास्त्राचा अभ्यास केला असावा. तरीसुद्धा आपण हे विधान का करता? आणि माझ्या माहितीप्रमाणे पु. ना. ओकांच्या तथाकथित शब्दिक पुराव्यांमधे संस्कृत किंवा हिब्रू भाषांचे उल्लेख नाहीत .त्यांनी अरबी व फारसी भाषांअधील दस्ताइवजांमधलीच अवतरणे दिली आहेत.

>> पण रोम चा उगम राम या शब्दात आहे असे सिद्ध करण्याचा >>प्रयत्न करून काय होणार? ह्या सुतावरून थेट तेथे रामचन्द्राचे >>राज्य होते हा स्वर्ग गाठणे ही विकृती आहे. ओकान्च्या कुठल्याच >>दाव्याला सबळ ज्याला substantive evidence  म्हणता येईल >>असा पुरावा नाही. जवळजवळ सर्वच पुरावे हे शब्दच्छल या >>सदरात मोडतात. 

>>इथे ओकांच्या शब्दांवर चर्चा चाललेली नाही. (जाता जाता... अंकोरवाट येथील विष्णुमंदिर किंवा सेऊल इथे नुकत्याच सापडलेल्या  दशरथाचे नाव असलेल्या विटा या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत काय? या गोष्टी तिथल्याच लोकांनी सांगितल्या. त्या जर आपण आधी सांगितल्या असत्या तर आपण पुन्हा भूतकाळाच्या उदात्तीकरणाचा आरोप केलाच असतात ना?)

>> इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ऐतिहासिक गोष्टीन्च्या >>बाबतीत कुठलाही पुरावा हा contextual असतो. तो तत्कालीन >>स्थलकालविशेष वा राजकीय, सामाजिक इ. सन्दर्भानेच घ्यायचा >>असतो. इतिहासाच्या बाबतीत हे तारतम्य विशेषत्वाने बाळगावे >>लागते. ओकान्च्या बाबतीत ते सुटले आहे असेच म्हणावे लागेल.

खुद्द तैमूरलंगापासून ते औरंगजेबापर्यंत सगळ्या शक्तिशाली मोंगल बादशहांच्या स्वलिखित नोंदींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे 'स्थलकालविशेष वा राजकीय, सामाजिक इ. सन्दर्भ घेणे काय? अशी कागदपत्रे आहेत हे तरी आपल्याला जेत्यांच्या इतिहाअसाने कळू दिले काय?

>>ताजमहाल हे शिवमन्दिर होते हे सिद्ध करण्यासाठी  फक्त ??>>नामसाधर्म्य दाखविणे पुरेसे नाही. जसे त्यानी तेजाजी हा >>विसालदार, वा आग्रेश्वर शिवमन्दिर इ गोष्टी उल्लेखित केल्या >>आहेत. ओकान्कडे तगडा पुरावा नसल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने >>त्यान्ची बाजू उचलून धरलेली नाही; उलट ताशेरे मारले आहेत.

पुन्हा एकदा ओकांच्या बोलण्यावर जाते आहे आपली गाडी! वर दिलेल्या तिसऱ्या दुव्याबद्दल आपले काय मत आहे? ते संशोधन तर ओकांनी केलेले नाहीका ए गोऱ्या साहेबाने केले आहे. नुस्त< ओक ओक आणि सर्वोच्च न्यायालय एवढीच जपमाळ ओढून काय होणार वैद्य साहेब?

>>ओकान्च्या ताजमहाल वा इतर दाव्यात तथ्य असते तर ही गोष्ट >>यदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई इ. इतिहासकारानी >>कशी ती उद्धृत केले नाही. ओकाना असे काय सापडले जे त्याना >>सापडले नाही?

माझा वरील मुद्दा लक्षात घ्यावा.

>>की सरकार, सरदेसाई वा इतर भारतीय इतिहासकार सुद्धा जेते->>अनुकूल इतिहास प्रमाण मानत होते?

तसे म्हणायला जागा असू शकते :)

 

>>सन्घ, भाजप इ. सन्स्था गुजरात, एम.पी. इ. ठिकणी जेव्हा >>त्यान्ची राज्ये असताना शालेय पाठ्यपुस्तकात अनेक बदल >>केलेले आहेत. उदा. पृथ्वीराज चोहान ने महम्मद घोरीस मारले न >>की उलटे, वा येशू ख्रिस्त काश्मिरात मरण पावला, तो हिन्दूच >>होता इ. या उलट  गैरसोईच्या मुद्द्याना बगल दिलेली आहे उदा. >>गान्धी हत्या ( ह्याचा उल्लेखच त्यात नाही! )

गांधी हत्येचा उल्लेख काँग्रेस सत्तेत असतानाही त्यांची हत्या झाली असाच होता. आपण बहुधा काँग्रेस शासनकाळातच इतिहास शिकलेला आहात. जरा आठवून बघा. येशू ख्रिस्त काश्मीरात मरण पावला हे पिल्लू ख्रिश्चनांनीच सोडले आहे. आपण जरा तपासणी करून पाहिलेत तर बरे होईल. आणि कआँग्रेसप्रणित शासनकाळात फक्त भारतीय स्वातंत्र्ययुद्ध आणि गांधी नेहेरूंचा त्यातला सहभाग हाच भाग परतपरत शिकवला गेला.(मी स्वतः भारतीय स्वातंत्र्यलढा कमीत कमी ६ वेळा इतिहासात शिकले आहे. ज्यात गांधी-नेहरू ही नावे वगळता इतर सुभाषंद्रा=वल्लभभाईंसारख्या नेत्यांबद्दल सुद्धा जास्तीत जास्त अर्धं पान माहिती होती.)

 

>>केवळ भाजप व सन्घ हे हिन्दुत्वाचे स्वयन्घोषित कन्त्राटदार >>असल्याने त्यना हे सोयिस्कर असलेली महितीच फ़क्त पुढे येवू >>देतात. भाजप-प्रणित अनेक शाळान्मध्ये केवळ त्याना अनुकूल >>अशाच पद्धतीने इतिहासाचे पुनर्लेखन केले आहे.

या मुद्द्याशी प्रचंड असहमती आहे.

>>( मुरलीमनोहर जोशीनी मागे ज्योतिष हे शास्त्र असून त्यात >>B.Sc.  ठेवावी असा फतवा काढल्याचा आठवते आहे का? )

मुरलीमनोहर जोशींची ती मागणी भाजपच्याच शासनकाळात फेटाळून लावण्यात आली होती हा तपशील आपल्याला अज्ञात दिसतो.

>>हे तुम्ही उल्लेखिलेल्या " जेते हे त्याना अनुकूल अशाच पद्दतीने >>इतिहास रचतात " या मुद्द्याला बळ देणारे आहे. ( भाजप सत्तेवर >>येवून जेता झाला नसता तर हे सगळे शक्य होते काय?)

भाजपवाले एक तर जेते नव्हते आणि तेही याच देशाचे नागरिक आहेत.बेकाय्देशीर बांगलादेशी मुसलमान घुसखोर नाहीत त्यामुळे जेते इतिहास लिहितात ही संकल्पनाच आपल्याला उमगलेली नाही असे वाटते.

>> ओकानी वा भाजप इ. नी ताज महालाची कार्बन डेटिन्ग टेस्ट >>कुठे व कधी केली याबद्दल अवाक्षर काढलेले नाही. हा सगळा >>प्रकार म्हणूनच सन्शयास्पद आहे.

गेली ३० वर्षे ओक ही टेस्ट व्हावी म्हणून भांडत आहेत. मेई ही टेस्ट का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. परंतू अन्यधर्मीयांची मने दुखावतात अशी लंगडी सबब पुढे करून त्या गोष्टीला परवानगी नाकारण्यात आली आहे ही आपणांस ठाऊक आहे काय>? हे संशयास्पद नाही काय?

--अदिती