(अदितीजी, भोमेकाका )
तुमच्या सर्वच मुद्दयान्चा समाचार घेणे इथे जागेअभावी शक्य नाही पण ठळक मुद्दे घेतो.
१.मला प्रथम हे सान्गावयाचे आहे की मला आपल्या वैद्यक परम्परेबद्दल अजिबात न्यून्गन्ड नाही. थोडे विषयान्तर होईल, पण आपली प्राचीन शास्त्रे ही महान आहेतच. त्यान्च्या दर्जाबद्दल कुठेही शन्का नव्हती. पण त्याच बरोबर हे ही लक्षात घ्यायला हवे की, या शास्त्रान्चा वस्तुनिष्ठ व चिकित्सक अभ्यास आपल्या देशात अजूनतरी फारसा झालेला नाही.(तो पाश्चिमात्त्य देश करताहेत व आपल्या शास्त्राना उचलून धरताहेत ). किम्बहुना, अशा अभ्यासाच्या अभावी काही विद्वानान्मध्ये आमची शास्त्रे जगातील कुठल्याही प्रश्नावर वा रोगावर तोड काढू शकतात असा गण्ड ग्रासलेला आहे. त्यातून अतिरेकी दावे करण्याची काहीना सवय लागते. माझ्यामते हा एक arrogance of inferiority आहे. मी न्यूनगण्ड म्हणालो ते या अर्थाने.
२. प्रस्तुत चर्चेत उपस्थित पुराव्यान्विषयी वा दुव्याविषयी बोलायचे झाल्यास -
२.१ हे सर्व दावे हे निरीक्षणे अशा स्वरूपात मोडतात. ( ती निरीक्षणे कितपत निरपेक्ष हा एक वेगळा मुद्दा आहे- पण तसे गृहित धरूनही ...) असे दिसते या सर्वामध्ये गृहीतके assumptions फार आहेत . काही निरीक्षणे करून लगेच निष्कर्षाला येण्याची घाई दिसते.
observations---assumptions---hypothesis----thesis अशी मान्डणी सामान्यतः कुठल्याही सन्शोधनात असावयास हवी. तुम्हीच जर नीट पाहिले तर ही मान्डणी कितपत या सन्शोधनात दिसते? उदा.
अ) नाम + मन्दिर ही सदरे-
यातील पुरावे हे शब्दच्छल या सदरात मोडतात. काही मुद्दे जरी ढोबळ्मानाने खरे वाटले तरी ते मुख्यतः misplaced analogies या प्रकारात येतात असे वाटते. नीट विचार करून पाहा. त्यातील कोणता पुरावा निश्चितपणे शिवमन्दिराच्या दिशेने जातो (ताजमहाल असल्याविशयी काही सन्शय जरूर निर्माण करतो तरीही ).
ब) कागदोपत्री पुरावा- हे पुरावे ज्याला mis-representation bias म्हणतात त्यात बसतात असे समजण्यास भरपूर वाव आहे. उदा.
दुवा १ मुद्दे १९-२१ घेतले तर सन्शोधकाने त्याला जे पाहिजे तेच व तसेच उचलून त्यावर निष्कर्ष बेतल्याचे दिसते. हाच माझ्यामते मिस्रिप्रेझेन्टशन बायस आहे. हे सगळे पुरावे ताजमहाल हा १६३१ पूर्वी अस्तित्त्वात होता का याबद्दल काही रास्त शन्का जरूर उत्पन्न करतात पण म्हणून लगेच ते शिवमन्दिरच होते हे कसे?
क) युरोपियन प्रवाशान्चे वर्णन-
त्यातील फ्रेन्च प्रवाशाने दिलेले वर्णन हे कागदोपत्री पुराव्याच्याविरूद्ध आहे. ते पुरावे हे मोघम या स्वरूपाचे आहेत. मान्डलेली गृहीतके धाडसीच म्हणावी लागतील. उदा. एखाद्या इमारतीचा ढिगारा उपसायला २२ वर्षे लागतील? हा तर्क-प्रमाद वाटतो.
ड) सन्स्कृत शिलालेख/कुराण/हत्ती/कार्बन १४ इ.--
हे सर्व पुरावे किरकोळ व घाईघाईने निष्कर्षला येणारे आहेत.
इ) वास्तुशास्त्रीय-
मी ह्यातला माहितगार माणूस नक्कीच नाही. पण ते कुठलेही पुरावे ताजमहाल हे शिवालय होते याकडे निश्चितपणाने निर्देश करीत नाही.
इतर पुरावे म्हणजे विसन्गती, कबर नव्हे इमारत, प्रेमप्रकरण वा इतर अनेक मुद्दे ताजमहालाचे वय, खर्च, त्याचा प्रणेता इ. बद्दलच्या स्थापित कल्पनाना आव्हान देतो पण तरीही ते शिवालय होते हे जरा far-fetched आहे.
दुवा १ व २ मधील मुद्दे सारखेच आहेत, त्यामुळे त्यान्ची उजळणी नको.
दुवा ३-
यातील छायाचित्रे
यातील काही छायाचित्रे ताजमहालावर हिन्दू नक्षीकाम, प्रतीके इ. असल्याचे दर्शवितात. काही तितकी थेट नाहीत.( त्या चित्राबरोबरची कॉमेंट्री मात्र vague, superficial अशी काही ठिकाणी वाटते. )
माझा मुद्दा-
१. हे बान्धकाम हिन्दू-मुस्लिम वास्तुशैलीचा नमुना असणे शक्य नाही काय? मोगल भारतात येऊन तेव्हा ३००-४०० वर्षे झालेली होती, तेव्हा अशी सान्स्कृतिक सरमिसळ होणे माझ्यामते शक्य आहे.
२. जर शहाजहान बादशाहाने हिन्दू मन्दिर पाडून त्याजागी ताजमहाल बान्धला असेल तर हे सर्व हिन्दू-सन्स्कृतीदर्शक पुरावे त्याने का शिल्लक ठेवले असतील ? आणि आजवरच्या शेकडो वर्षात कुठल्याच मुस्लिम बादशहाने ते का मिटविले नसतील? ( बहुदा पुढे जाऊन मनोगतीन्मध्ये वाद घालण्याची सोय ठेवावी असे तर त्याना नसेल वाटले?! असो. )
दिलेले सर्व ११० मुद्दे एकामागून एक असे चर्चिता येतील.
पण माझ्यामते अशा नाजूक इतिहास विषयात पुराव्यान्ची विश्वसनीयता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आधी म्हटल्याप्रमाणे इतिहासाचे पुरावे हे contextual असतात. त्यात value-judgements खूप असतात. त्यातून भारतात असे इतिहास राज दरबारतील एखादा अधिकारी लिहित असे त्यामुळे ते authorty-sponsored असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अदितीताई, जेत्यानी पक्षी इन्ग्रजानी आपला इतिहास लिहिला हे चुकीचे आहे. शिवकाळात व त्यापूर्वीही बखरीद्वारे इतिहास जपला जायचाच की. शिवाय इन्ग्रजानी gazettiars द्वारे आधुनिक भारताचा इतिहास जपण्यास मदतच केली आहे. इनग्रजी राज्यात काही तत्कालीन गव्हर्नर, कलेक्टर इ. अधिकारी वेदान्चा अभ्यास करीत असल्याची माहिती काही पुस्तकातून आली आहे. राजवाडे, सरकार, सर्देसाई प्रभृती मन्डलीनी काय इन्ग्रजप्रणीत इतिहासाचे सन्शोधन केले? त्यामुळे इन्ग्रजानी आपला इतिहास त्यान्च्या मर्जीप्रमणे लिहिला ही गोष्ट पूर्ण सत्य नाही. ( इथे सावरकरानी १८५७चे स्वातन्त्र्यसमर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत इन्ग्रजानी त्यास शिपायान्चे बन्ड असे म्हणून रद्दबातल केले होते असे म्हटल्याचे आठवते. पण सावरकरानी इंग्रजांस दोष देत न बसता तो चुकीचा इतिहास बदलला होता- हे त्यानी जेते या देशात असताना केले होते. आता इंग्रज जाऊन ५८ वर्षे झाली आहेत. )
भाजपवाले/संघ यांच्या खोट्या कळवळ्याविषयी शेकडो पुरावे देणे शक्य आहे पण तो प्रस्तुत चर्चेचा विषय नाही.
शेवटचा मुद्दा कर्बन १४ च्या टेस्टचा-
तो यानी दिलेल्या दुव्यावरून तुम्ही जर पुढे गेलात तर संघाच्या ऑर्गनायजर या मुखपत्रात कार्बन १४ ची टेस्ट केल्याचे म्हटले आहे वा ओकांच्या पुराव्यात "एका अमेरिकन लॅब ने " ही टेस्ट केल्याचे म्हटले आहे. पण अधिक तपशील दोघांकडूनही आले नाहीत !!