सर्वोच्च न्यायालयाने ओकांचे संशोधन खोटे असे ठरवलेले नाही. त्यांनी ताजमहालचा इतिहास पुन्हा लिहावा या याचिकेला फेटाळले.
एकंदर उपलब्ध माहिती त्रोटक आहे. पण एवढेच कळले. कदाचित योग्य याचिका बनवायला जे कौशल्य लागते ते ओकांकडे नसेल. कदाचित राजकीय दबाव असेल.
आता यावरुन ओक खोटारडे आणि त्यांचे मुद्दे कचरा असे ठरवायचे का? मला वाटत नाही.
जर त्या मुद्द्यात काही तथ्य नसेल तर इतिहासतज्ञ मंडळी रोखठोक उत्तरे देऊन त्यांना निकालात काढतील. पण हे लोक "काय मूर्ख माणूस आहे" एवढाच प्रतिवाद का करत आहेत? हा घे पुरावा आणि तोंड काळे कर असे का नाही करत?
त्यांचे काही मुद्दे तर विचारणीय आहेतच. उदा. त्याच्या तथाकथित उदंड प्रेम असणाऱ्या बायकोचे नाव मुमताझ उल झमानी असताना नावाची मोडतोड करुन ताज (झ नव्हे) का व्हावे?