हे अनेक दावे करताना त्यांचा टोन कुठेही अशीसुधा एक 'शक्यता' असू शकते, आणी त्यादीशेने संशोधन करण्यास काय हरकत आहे? असा अजिबात नाही. त्यांचे सर्व दावे हे 'हेच अंतिम सत्य आहे' अश्या गुर्मीवजा भाषेने भरलेले असतात. साहीजकच त्यांच्या तथाकथित संशोधनाला काडीचीही किंमत न राहता त्याची खिल्ली उडवली जाणे स्वाभाविक आहे.
सहमत...पण खिल्ली उडवणे जाणे आणि धादांत चूक आहे हे सिद्ध होणे यात फरक आहे असे वाटते.
तसेच...
जो पर्यंत ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तो पर्यंत ठोसपणे कुणालाच काहीही निष्कर्षापर्यंत जाता येणार नाही.
हाच तेजोमहालय समर्थकांचा मुख्य मुद्दा आहे. दोन किंवा अधिक माणसांनी अनेक निरीक्षणे आणि संशोधनाच्या आधारे अनेक विसंगती दाखवून देऊन त्या वास्तूबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. पण त्या शंकांची योग्य ती दखल न घेता "सदर इसम खुळचट आहे", "हे अशक्य आहे" किंवा "निव्वळ मूर्खपणा" असे म्हणून सदर इमारतीचा प्रश्न निकालात काढणे पटत नाही.
अभियांत्रिकीमध्ये "फेल्युअर ऍनालिसीस" करणाऱ्यांना या मुद्द्यामागची भूमिका लगेच कळेल. किंवा जसे आपल्या आरोग्याच्या बाबतीत शंका आली की त्याची योग्य ती दखल घेऊन तज्ज्ञांना दाखवून, तपासण्या करून आपण योग्य ती पावले उचलतो, तसेच काहीसे.
"हा सूर्य, हा जयद्रथ" या न्यायाने सर्वंकश संशोधन करून सदर वादाचा निकाल लावण्यापेक्षा चार-दोन शब्दात एखाद्या माणसाला मूर्ख ठरवून त्याला आणि वादाला निकालात काढणे किती योग्य आहे?