अर्थात, हे स्त्री आणि पुरूष,दोघांनाही लागू आहे..आणि आपल्या चुकीचे परिणाम कोणीतरी इतर भोगतं... गर्भपात हा मनुष्यवधच आहे...किंबहुना त्यापेक्षाही जास्त निंदनीय आणि शिक्षेस पात्र आहे...

अंशतः सहमत.

फॅमिली प्लॅनिंग किंवा परिवार नियोजन म्हणून एक संकल्पना अस्तित्वात आहे. त्याचा आर्थिक नियोजनाशी सरळ सरळ संबंध असतो असे वाटते.

समजा...

आपले निवृत्तीचे वय, उत्पन्न, खर्च, आणि बचतीचे अडाखे बांधून एखाद्या दाम्पत्याने दोन (किंवा एक किंवा तीन) अपत्ये असावीत असे ठरवले.

सर्व काळजी (म्हणजे निरोध आणि/किंवा गोळ्या) घेऊनही गर्भ राहिला तर काय करावे? दोन (किंवा एक किंवा तीन) यांना जे सुख, शिक्षण, संपत्ती देणार होतो ते सर्व तिघांमध्ये (किंवा दोघांमध्ये किंवा चौघांमध्ये) 'वाटावे' का?

आणि/किंवा

गर्भ राहिल्याने स्त्रीच्या आयुष्यास धोका असेल तरीही त्या अपत्यास जन्मास घालून स्त्रीच्या मृत्यूचा धोका पत्करावा का?

आणि/किंवा

एखाद्या प्राणघातक रोगाची/विषाणूची (उदाo HIV/AIDS) बाधा आपल्याला झाली आहे हे गर्भ राहिल्यावर पालकांना समजले असेल तर काय करावे? (उदाहरणातल्या विषाणूची बाधा फक्त स्वैर लैंगिक संबंधातून होत नाही हे ध्यानात घ्यावे.) ते रोगी अपत्य जन्माला घालावे का?

आणि/किंवा

बलात्कारातून गर्भ राहिला असेल तर ते अपत्य जन्माला घालावे का?

आणि/किंवा

गर्भ राहिल्यावर घटस्फोट झाला असेल तर ते अपत्य जन्माला घालून दोघांनीही अडकावे का?

आणि/किंवा

स्त्रीचे मानसिक आरोग्य ठीक नसेल, त्यातून जन्माला येणाऱ्या बाळाला धोका असेल तर ते बाळ जन्मास घालावे का?

गर्भधारणेच्या ३ऱ्या महिन्यांनंतर गर्भपाताचा विचारसुद्धा करू नये असे वाटते. तसेच केवळ मुलगी नको या कारणाने गर्भपात करण्याला माझा सख्त विरोध आहे.

पण तरीही वरील सर्व परिस्थितींत काय करावे असा प्रश्न पडतो? जितक्या स्पष्ट शब्दांत आपण गर्भपाताला निंदनीय आणि शिक्षेस पात्र ठरवले आहे तितक्याच स्पष्ट शब्दांत वरील प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करणे गैर ठरू नये असे वाटते. काहीही झाले तरी तो गर्भ जन्माला घालावा हे वरच्या सर्व परिस्थितींत योग्य कसे ठरते हे सांगावे.