भोमेकाका,
तुम्ही मांडलेले सर्व मुद्दे विचार करायला लावणारे आहेत.
फॅमिली प्लॅनिंग किंवा परिवार नियोजन म्हणून एक संकल्पना अस्तित्वात आहे. त्याचा आर्थिक नियोजनाशी सरळ सरळ संबंध असतो असे वाटते.
अगदी बरोबर.
समजा...
आपले निवृत्तीचे वय, उत्पन्न, खर्च, आणि बचतीचे अडाखे बांधून एखाद्या दाम्पत्याने दोन (किंवा एक किंवा तीन) अपत्ये असावीत असे ठरवले.
सर्व काळजी (म्हणजे निरोध आणि/किंवा गोळ्या) घेऊनही गर्भ राहिला तर काय करावे?
असे एक उदाहरण पाहिले आहे. त्या बाईला १७ वर्षाचा एक मुलगा आहे. सर्व काळजी घेउन सुद्धा गर्भ राहिला. त्या बाईला वाटले की तिची मासिक पाळी संपली म्हणून डॉक्टरांकडे तपासायला गेली तर ती गर्भवती आहे असे कळाले. नवऱ्याची नोकरी गेली म्हणून तिच्या एकटीच्या पगारावर घरखर्च चालला होता. मनात नसुन सुद्धा गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागला.
गर्भ राहिल्याने स्त्रीच्या आयुष्यास धोका असेल तरीही त्या अपत्यास जन्मास घालून स्त्रीच्या मृत्यूचा धोका पत्करावा का?
नक्कीच नाही.
गर्भ राहिल्यावर घटस्फोट झाला असेल तर ते अपत्य जन्माला घालून दोघांनीही अडकावे का?
हा पण जरा अवघडच प्रश्न आहे. पण अपत्य जन्माला घालावे कारण घटस्फोट झाला तर नवीन येणाऱ्या जीवाचा काय दोष?
बऱ्याच बायका दोघांचे पटत नसले तरी केवळ मुलांकरता घटस्फोट घेत नाहीत
बाकीचे प्रश्न खूपच अवघड आहेत. आहे त्या परिस्थितीत मूल जन्माला घालणे असा सकारात्मक विचार केला तरी सुद्धा प्रत्यक्षात तितकेच अवघड.