राजीव_अनंत,

सर्वप्रथम आपल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

तुमच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे वाटते म्हणून सांगत आहे की माझं दोस्तमंडळ हे खूप मोठं आहे, त्यामुळे सोयीच्या मैत्रिणी वगैरे काही प्रकार नाही. जे आहे ते आहे, ते तसंच्या तसंच मी नेहमीच सांगितलेलं आहे. मान्य करायचं तर करा, नाही केलंत तर जे तुमच्या सोयीनी तुम्हाला गृहित धरायचंय ते गृहित धरायला तुम्ही नेहमीप्रमाणे मुखत्यार आहात, हे वेगळे सांगणे न लगे.
 
मनोगतवर लिहिलेलं माझं लेखन मी जरूर दुसऱ्या/तिसऱ्या नाहीतर कुठल्याही स्थळावर टाकेन, कुठल्याही स्वरूपात जतन करेन, यात कोणी हस्तक्षेप करायची मला गरज वाटत नाही. मी लिहायला सुरू केलेल्या ज्या साहित्यावर इकडे काहीही कारणांनी का असेना पण ताशेरे ओढले गेले ते माझंच साहित्य जर मला दुसरीकडे कुठे लिहून पूर्ण करावंसं वाटलं आणि म्हणून मी ते दुसरीकडे कुठे लिहीलं तर त्यात चुकलं ते कुठे? दुसऱ्यांचं साहित्यही त्यांच्या नावासकट त्यांच्या परवानगीने मी कुठे लिहून घेतलं तर बिघडलं कुठे? मनोगत हे केवळ एक माध्यम आहे माझ्यासाठी माझ्या भावना/विचार मांडायला, पण इथे जर वेगळ्या मनोभूमीचा वाचकवर्ग असेल आणि त्यांना माझं लेखन आवडत नसेल तर मी माझे भावना/विचार व्यक्त करायला मला पूर्ण स्वातंत्र्य देईल अशी दुसरी जागा शोधणं हे अगदी साहजिक आहे, आणि तेच मी केलं आहे. यात मी कुठलीही लपवालपवी केलेली नाही, पण ते पूर्णतया माझं खाजगी प्रकाशन असल्याने मी सर्वांना त्याबद्दल सांगणे जरूरीचं नाही समजलं. या वागण्यातही जर कोणाला आक्षेप असेल तर खुशाल असू दे. आय डोंट केअर..

'क्षिप्राची कविता वेदश्रीने चोरली' हा प्रकार मी मनोगतवर नविन आले होते तेव्हाचा आहे.या प्रकाराबद्दल जे होतं ते त्याचवेळेस तिथेच माझं स्पष्टीकरण देऊन मी सष्ट केलेलं आहे. त्याहून जास्त माझ्याकडे सांगायला तेव्हाही काही नव्हतं आणि आजही काही नाही. त्यातून धडा घेऊन मी माझ्यात योग्य ते बदल करून घेतले आहेतच पण तरीही तीच तेढ आजही कोणी मनात बाळगून असेल तर त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. त्यांच्या त्याही भावनांचा मी आदरच करते.