१. पिंगळावेळ - जी.ए.कुलकर्णी
२. वनवास - प्रकाश नारायण संत
३. दुस्तर हा घाट आणि थांग - गौरी देशपांडे

१. पिंगळावेळ मधील विशेष आवडणाऱ्या कथा -

कैरी - तानीमावशी आणि मास्तरांचे व्यक्तिचित्रण अप्रतिम. मास्तरांच्या तोतरेपणाची नक्कल केल्यानंतर मास्तरांचा समजूतदारपणा खुप मनाला भावतो. असंख्य वेळा ही कथा वाचूनही प्रत्येकवेळी कथा वाचतांना रडू येते.
स्वामी - तळघरात कोंडलेल्या स्वामीला एके दिवशी एक छोटे रोपटे दिसते. तो त्याला रोज पाणी घालतो. तेवढीच एक खुण असते तळघरात जिवंतपणाची. हळूहळू रोपटे मोठे होत जाते. त्याला श्वासोश्वासासाठी ठेवलेल्या नळातून ते वर वर जात असते. शेवटी रोपटे जेव्हा वरती सुर्यप्रकाशाला भेटेल तेव्हाच आपला अंत आहे हे त्याला कळते. ' मी संपलो नाही तर केवळ बदललो आहे. माझा प्रत्येक श्वास म्हणजे एक एक पान आहे.' स्वामीचे शेवटचे स्वगत खुप चिंतनीय.
आर्फियस - आर्फियस आणि यूरिडिसी ह्यांची एक वरवर साधी वाटणारी पण विचार करायला लावणारी प्रेमकथा

२. वनवास - सतराशे साठ वेळा म्याडसारखं वाचलं तरी त्याची गोडी संपतच नाही.

३. दुस्तर हा घाट आणि थांग - दोन दिर्घकथा. नमू आणि कालिंदी अगदी आपल्याश्या वाटतात.