क्षिप्राताई,
ही सगळी पुस्तकं वाचायला आवडेल मला. गौरी देशपांड्यांचं निरगाठी आणि चंद्रिके गं सारिके गं वाचलंय मी. शिवाय उत्खनन पण वाचलंय. उत्खनन हे तर माझं अतिशय जिव्हाळ्याचं पुस्तक आहे. हे पुस्तक असं थेंबाथेंबाने मनात झिरपत जातं. आणि कुठेतरी मनात साठून राहतं. त्यातली माणसं वेगळीच आणि छान आहेत. ती अचानक अनपेक्षितपणे अचूक संदर्भ देत आठवत राहतात. मला आवडलेली चौघीजणी व्यतिरिक्त बहुधा ही पहिली कादंबरी असावी. फारच सुरेख. आणि गौरी देश्पांड्यांची भाषा इतकी निर्मळ आणि प्रवाही आहे की बासच. खूप छान वाटतं वाचताना. त्या भाषेतला नाद आणि 'शाणी','बख्खळ','बाळी' वगरे त्यांचे हातोटीचे शब्द मनात खूपदा रेंगाळतात. दयाळ, मणी, अर्णव, तीर्थंकर, दुनिया अशा जगावेगळ्या नावांच्या पात्रांची ही नावंही अक्षात राहून जातात.
वरदाताईंच्या आवडत्या पुस्तकांबद्दल वाचूनही खूप छान वाटलं. मी ही पुस्तकं आवर्जून वाचीन. तुम्ही माझा http://www.manogat.com/node/2590
इथला लेख वाचला आहे का? हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला ते खूपच आवडेल.
अशाच इतर पुस्तकांबद्दल वाचायला अतिशय आवडेल.(मुक्तसुनित यांची क्षमा मागून असे लिहिण्याचा आगाऊपणा करते आहे)
--अदिती