हिंसाचारामुळे कोणतेच प्रश्न सुटत नसतात.

हिंसाचारामुळे कुठलेच वैचारिक मतभेद योग्य रितीने सुटत नसतात. सहमत.

या पुस्तकात शिवरायांचा संबंध होमरच्या महाकाव्यातील इडीपसशी जोडला आहे. हा इडीपस शूर होता हे मान्य आहे तरीही त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्याचे त्याच्या मातेसोबतच अनैतिक संबंध होते.

मूळ पुस्तकात ही तुलना फक्त शौर्याबद्दलच नव्हती याची खातरजमा आपण/टिकाकारांनी केली असेल अशी आशा आहे.

ही लढाई वैचारिक आहे असे वाटते. ही दूषित मते (पुस्तकातील) केवळ त्या पुस्तकाच्या वाचकापर्यंत इत्यादीच पोहोचणार असतील तर अशा पुस्तकावर बंदी व याचे खंडन करणारे तर्कशुद्ध लेखन पुरेसे ठरावे. जर हे पुस्तक वाचून वाचकांचा अशा भाकडकथांवर विश्वास बसणार असेल तर आपली स्पष्टीकरणे वाचून तो दूर व्हायला ही हरकत नसावी.

मला माहीत आहे ,इथे माझ्या विचाराचे लोक नगण्य आहेत.

इथे म्हणजे मनोगतावर की देशोन्नती च्या वाचकांमध्ये की शिवधर्म समर्थकांमध्ये? (थोडक्यात हे पत्र वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले जसेच्या तसे आहे की मनोगतासाठी संपादित?)

आम्हीही आपलेच आहोत.

लोभ असावा.